नागपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गंत ग्रामीण भागातील महिला समूहांनी १५ हजार मास्क तयार केले आहेत. त्यापैकी १२ हजार ५०० मास्कचा पुरवठा जिल्हा आरोग्य विभागाला करण्यात आला.
ज्ञानज्योती, सक्षम आणि नई दुनिया या नागपूर ग्रामीण आणि हिंगणा तालूक्यातील समूहांनी हे मास्क तयार केले. नरखेड व भिवापूर तालुक्यातील समूहांनी स्थानिक ग्रामपंचायतींना मास्कचा पुरवठा केला. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूह सुरक्षेच्या हेतूने माफक दरात मास्क तयार करुन देत आहेत.
समूहांना कापड उपलब्ध झाल्यास प्रति दिवस पाच हजार मास्क यतार करुन पुरविण्याची त्यांची क्षमता आहे. हे मास्क निजंर्तुकीकरण करुन पुरवठा करण्यात येतात, अशी माहिती समुहातर्फे देण्यात आली.
या मास्कची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, प्रकल्प संचालक विवेक इलमे व जिल्हा अभियान व्यवस्थापक रविंद्र परतेकी यांनी केली. कोरोना’पासून बचावासाठी मास्कची आवश्यकता असल्यास जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर येथे कार्यरत अमोल बाविस्कर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. काटोल तालुक्यातील उपजीविका सखी प्रविणा वानखेडे यांनी घरगुती सॅनिटायजर तयार केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.