...तर २ ते ३ अंशांनी पृथ्वीची तापमानवाढ अटळ!

जैवविविधता जोपासली नाही, कार्बन उत्सर्जन कमी केले नाही, तर पृथ्वीचे तापमान किमान २ ते ३ अंशांनी वाढणे अटळ असल्याचे विचार ज्येष्ट पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले.
...तर २ ते ३ अंशांनी पृथ्वीची तापमानवाढ अटळ!
...तर २ ते ३ अंशांनी पृथ्वीची तापमानवाढ अटळ!

लातूर : जैवविविधता जोपासली नाही, कार्बन उत्सर्जन कमी केले नाही, तर पृथ्वीचे तापमान किमान २ ते ३ अंशांनी वाढणे अटळ असल्याचे विचार ज्येष्ट पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केले. ‘शेती नव्याने समजून घेताना’ आणि ‘वसुंधरेची आर्त हाक’ या रमेश चिल्ले लिखित दोन्ही पुस्तकांचे शनिवारी (ता. ३) ऑनलाइन प्रकाशन पार पडले. या सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते प्रमुख उपस्थित होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे प्रमुख पाहुणे होते.  श्री. देऊळगावकर यांनी पर्यावरणाचे वर्तमान व जागतिक प्रश्‍न आणि भविष्यातील मानवी अस्तित्वासमोरील धोके अधोरेखित करत माती, जमीन आणि पाणी याबद्दल आपण सर्वांनी गंभीर व विवेकी हस्तक्षेप करायला हवेत. अन्यथा, आपण मोठ्या संकटात सापडणार असल्याचे सांगून अशावेळी आलेल्या दोन्ही पुस्तकांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,‘‘ ‘विकास’ का ‘पर्यावरण’ म्हटलं की पर्यावरण खड्ड्यात घातलं जात. उत्तराखंडच्या आपत्तीतून आपण काही शिकणार की नाही. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने २१ व्या शतकातील २ दशक वाया घालविली. त्यामुळे आताचे दशक पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक आहे.’’ कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, ‘‘जमीन, पाणी, हवा व वनस्पती कृषी व्यवस्थेचे मूलाधार आहेत. प्रदूषणामुळे शेतीचा डोलारा दोलायमान झाला आहे. अशा स्थितीत शेती हा विषय व त्यावरील लिखाणाची गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. रमेश चिल्ले यांनी केलेलं लिखाण हे नव्याने या प्रश्‍नांची जाणीव निर्माण करण्यास प्रेरणादायी ठरेल.’’ श्री. मोहिते यांनी एकूण शेतीविषय मराठवाड्यातील शेतकरी आंदोलने, शेती प्रश्‍नाबद्दलच्या भूमिकांचा व साहित्याचा प्रवास मांडला. ते म्हणाले, की शेती प्रश्‍न भावनिक न होता अर्थशास्त्रीय दृष्टीने विचार करून शेती व शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल हे बघने गरजेच आहे. शेतीविषक मध्यमवर्गीय शहरी भूमिकांनी प्रचंड नुकसान केले आहे.  लेखक रमेश चिल्ले यांनीही दोन्ही पुस्तकांचा व आपल्या लेखनाचा प्रवास मांडत शेती, कुटुंब आणि ग्रामीण पार्श्‍वभूमी सांगितली. प्रास्ताविक हरिती प्रकाशनाचे दीपक कसाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पंचशील डावकर आणि आभार हरिती बुक गॅलरीचे प्रमुख राहुल लोंढे यांनी मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com