थेट जनतेतूनच सरपंच निवड महत्त्वाची ः अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देताना सरपंच परिषदेचे पदाधिकारी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देताना सरपंच परिषदेचे पदाधिकारी

नगर  ः देशात खरी लोकशाही आणायची असेल, थेट जनतेतूनच निवड महत्त्वाची आहे. त्यामुळे सरपंच नव्हे, तर मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची निवडसुद्धा थेट जनतेतून होणे गरजेचे आहे. मुळातच पक्षपातळीवर व गटागटाने होणाऱ्या निवडणुका घटनेच्या विरोधात आहेत, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी निवेदन दिल्यानंतर श्री. हजारे यांनी याबाबत लेखी संवाद साधला. जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय राज्य सरकारने नुकताच बदलला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष अनिल गीते पाटील, महिला आघाडीच्या स्वाती नऱ्हे, नारायण वनवे, आबासाहेब सोनवणे, अरुण ठाणगे आदींसह पदाधिकाऱ्यांनी श्री. हजारे यांना राळेगण सिद्धी (ता. पारनेर) येथे निवेदन दिले आणि जनतेतूनच सरपंच निवडण्याचा निर्णय कायम ठेवण्यास सरकारला भाग पाडावे, अशी मागणी केली. 

श्री. हजारे यांचे सध्या मौन आंदोलन चालू असल्याने त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी लेखी संवाद साधला. श्री. हजारे म्हणाले, की सरपंच थेट जनतेतून निवडला जाण्याबाबत मी स्वतः आग्रही असून सध्याचा हा नियम बदलू नये यासाठी प्रयत्न करेल. या वेळी सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी श्री. हजारे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com