कोणतीही गोष्ट योग्य वेळी योग्य ठिकाणी झाल्यास त्याचे निष्कर्ष उत्तम मिळतात, ही सर्वमान्य बाब खतांच्या वापराबाबत एकदम सत्य आहे. खतांचा वापर पिकांच्या वाढीच्या योग्य टप्प्यामध्ये करण्याविषयी सातत्याने अभ्यास होत असतो. कॅनडा येथील संशोधकांचा गट शेतकऱ्यांसाठी खतांचे योग्य ते मिश्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल क्वालिटी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. जेव्हा शेतकरी खते देतात, तेव्हा ती जमिनीमध्ये राहून पिकांना उपलब्ध होत राहतील, अशा विश्वास असतो. मात्र, शेतातून वाहून, निचरा होऊन जाणाऱ्या पाण्यासोबत दिलेल्या खतापैकी मोठा भाग जातो. कॅनडामध्ये पाणी दोन प्रकारे नुकसान करते. त्यात पावसाचे पाणी आणि पडलेला बर्फ वितळून होणारे पाणी असे दोन प्रकार आहेत. या दोन्ही बाबींचा विचार करून खतांचा ऱ्हास रोखण्यासाठी कॅनडा येथील युनिव्हर्सिटी ऑफ सॅस्कट्चेवान येथील जेफ श्चोईनाऊ आणि त्यांचा गट प्रयत्न करत आहे. जेफ श्चोईनाऊ म्हणाले की, आम्ही प्रामुख्याने स्फुरदयुक्त खतांच्या कार्यक्षम वापरासाठी संशोधन करत होतो. उत्तरेकडील भागामध्ये खते दिल्यानंतर होणारा ऱ्हास मोठा आहे. तो कमी करून पिकांसाठीची त्याची उपलब्धता वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.