युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स येथील संशोधकांसह ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि अमेरिकेतील संशोधकांनी एकत्रितरीत्या केलेल्या अभ्यासातून वातावरणातील घटकांच्या (उदा. दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, मोठा पाऊस इ.) तीव्रतेमुळे मका, गहू, भात आणि सोयाबीन सारख्या पिकांच्या उत्पादनामध्ये १८ ते ४३ टक्क्यांपर्यंत चढ उतार होत असल्याचे निष्कर्ष पुढे आले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी जागतिक पातळीवरील वातावरणातील बदलांसाठी अधिक संवेदनशील प्रदेशही ओळखले आहेत. हे प्रदेश जागतिक बाजारपेठेतील महत्त्वाचे पुरवठादार आहे. येथील वातावरणातील बदलांचे परिणाम जागतिक बाजारपेठेवर पर्यायाने मोठ्या प्रदेशांवर पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. हे संशोधन ‘एन्व्हायर्मेंटल रिसर्च लेटर्स’ मध्ये प्रकाशित केले आहे. कृषी उत्पादनामध्ये वातावरणातील तीव्र घटकांमुळे होणाऱ्या परिणामांची किमान स्थिती जाणून घेण्यासाठी संशोधकांनी जागतिक कृषी माहिती साठा, या काळातील जागतिक वातावरणातील बदल, त्यांची तीव्रता यांची सांगड घातली आहे. या माहितीच्या विश्लेषणासाठी त्यांनी रॅंडम फॉरेस्ट्स या यंत्र प्रशिक्षण अल्गॉरिदमचा वापर केला. अभ्यासाविषयी माहिती देताना युनिव्हर्सिटी ऑफ मेलबॉर्न येथील डॉ. एलिसाबेथ व्होगेल यांनी सांगितले, की उत्पादनातील बदलासाठी महत्त्वाच्या असलेल्या हवामानातील घटकांमध्ये तापमान हा मुद्दा पावसापेक्षाही अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आश्चर्यकारकरीत्या पुढे आले आहे. आपण साधारणपणे उत्पादनावर परिणाम करणारा घटक म्हणून पावसाकडे पाहत असलो तरी पिकाच्या वाढीच्या कालखंडामध्ये सातत्याने वाढत असलेल्या सरासरी तापमान, तापमानाने गाठलेली तीव्रता याच बाबी पिकांच्या उत्पादनाच्या अंदाज मिळविण्यामध्ये प्रमुख ठरणार आहेत. संशोधनातील महत्त्वाचे...
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.