Government Decision on Pulses Import: केंद्र सरकारने तूर आणि उडदाच्या मुक्त आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तसेच पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील ३० टक्के शुल्क कायम ठेवले आहे. देशातील उत्पादन घटल्यामुळे आणि येणाऱ्या खरिपावर ‘एल-निनो’चे सावट असल्याने तूर, उडीद आणि पिवळ्या वाटाण्याची आयात सुरळीत राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा दबाव देशातील बाजारावर राहण्याची शक्यता आहे..केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने मंगळवारी (ता. ३१) वेगवेगळ्या अधिसूचना काढून कडधान्य धोरण कायम ठेवले आहे. तूर आणि उडीद मुक्त आयातीची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी संपत होती. त्यानंतर तूर आणि उडीद आयातीवर शुल्क लागू होणार होते. तसेच पिवळा वाटाणा आयात प्रतिबंधित श्रेणीतून काढत मुक्त श्रेणीत ठेवली, तसेच किमान आयात मूल्यही काढले होते. पण १ नोव्हेंबर २०२५ पासून पिवळा वाटाणा आयातीवर ३० टक्के शुल्क लागू केले होते..Pulses Import Policy: कडधान्य आयातीवरून ‘सर्वोच्च’ कानपिचक्या.देशात मागील तीन वर्षांपासून कडधान्य आयात वाढत आहे. २०२४-२५ मध्ये देशात जवळपास ७३ लाख टन कडधान्य आयात झाली होती. यंदाही ५३ लाख टन आयातीचा अंदाज आहे. तूर, उडीद आणि पिवळ्या वाटाण्याची विक्रमी आयात होऊन देशात भाव पडले आहेत. त्यामुळे आयात शुल्क वाढविण्याची मागणी केली जात होती. पण केंद्र सरकारने आहे तेच धोरण पुढील वर्षभर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. .तूर आणि उडदाची आयात ३१ मार्च २०२७ पर्यंत मुक्त राहणार आहे. म्हणजेच आयातीवर शुल्क आणि मर्यादा नसेल. तर पिवळा वाटाणा आयातीवर केवळ ३० टक्के शुल्क कायम राहील. आयातीच्या लोंढ्यामुळे मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांना कडधान्यासाठी चांगला भाव मिळाला नाही. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांनी कडधान्याची लागवड कमी केली होती. परिणामी, यंदा तुरीचे उत्पादन केवळ ३४ लाख टन होण्याची शक्यता आहे..Chana Import: हरभऱ्याच्या आयातीत तिप्पट वाढ.देशात ४७ लाख टन तुरीचा वापर होतो. सरकार तुरीच्या उत्पादनातील तूट आयात करून भरून काढणार आहे. त्यासाठी आयात मुक्त ठेवली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. २०२४-२५ मध्ये देशात १२ लाख ३२ हजार टन आयात झाली होती. तर २०२५-२६ मध्ये विक्रमी १४ लाख ५० हजार टन आयात झाल्याची माहिती आहे. आता नव्या वर्षातही सरकारच्या निर्णयामुळे आयात अधिक राहण्याचा धोका आहे..बाजारावर परिणाम नाहीसरकारने मुक्त तूर आयातीचे धोरण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा बाजारावर परिणाम दिसून आला नाही. कारण देशातील उत्पादन पाहता सरकार तूर आणि उडीद आयात मुक्त ठेवेल याचा अंदाज बाजारात आधीपासून व्यक्त केला जात होता. त्यामुळे बाजारावर या निर्णयाचा परिणाम जाणवला नाही..कडधान्य आयात शुल्क (टक्क्यांत)तूर ०उडीद ०हरभरा १०मसूर १०पिवळा वाटाणा ३०.सरकारने देशात या कडधान्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. तूर आणि उडीद उत्पादन यंदा कमी झाल्याने सरकार मुक्त आयातीला परवानगी देण्याची शक्यता आधीपासूनच होती. त्यामुळे बाजारावर याचा परिणाम दिसून आला नाही.राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया.सरकारचा हा निर्णय अपेक्षितच होता. सरकारने वर्षभराचे धोरण जाहीर केल्यामुळे बाजारात याचा सकारात्मक संदेश जाईल. येणाऱ्या खरिपावर एल-निनोचे सावट असल्याचे अंदाज आहेत. अशा परिस्थितीत देशातील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.बिमल कोठारी, अध्यक्ष, इंडिया पल्सेस ॲण्ड ग्रेन्स असोसिएशन.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.