Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीत वाढ

Onion Market : निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे ३ हजार कोटींवर नुकसान झाले असताना या अधिसूचनेमुळे त्यांच्या कष्टाची होळी होणार असल्याची स्थिती आहे.
Onion Export Ban
Onion Export Banagrowon

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने ग्राहकांसाठी पुन्हा कांदाप्रश्नी हस्तक्षेप केला आहे. शुक्रवारी (ता.२२) केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी अधिसूचना काढत ३१ मार्चपर्यंत असलेली निर्यातबंदी पुढील आदेशापर्यंत कायम राहील, असे स्पष्ट केले आहे. निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांचे ३ हजार कोटींवर नुकसान झाले असताना या अधिसूचनेमुळे त्यांच्या कष्टाची होळी होणार असल्याची स्थिती आहे.

यापूर्वी ८ डिसेंबरपासून निर्यातबंदी करून ती ३१ मार्चपर्यंत कायम राहील, असे सरकारने स्पष्ट केले होते. त्यामुळे ३१ मार्चनंतर निर्यातबंदी मागे घेतली जाईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. सरकार केवळ ग्राहकांचा विचार करीत आहे. केंद्राने यापूर्वी कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क, त्यानंतर किमान निर्यात मूल्य प्रतिटन ८०० डॉलर तर ७ डिसेंबरपासून थेट निर्यातबंदीची घोषणा केली.

Onion Export Ban
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी कायम; निवडणुकीसाठी सरकारकडून अनिश्चित काळासाठी निर्यातबंदी

तिची अंतिम मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत होती. या निर्यातबंदीनंतर १०६ दिवसांत बहुतांश कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही. निर्यातबंदीने कांदा उत्पादकांसह व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर हे सर्व जण अडचणीत आहेत. त्यात सरकारने या निर्णयाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया कांदा उत्पादकांमधून उमटत आहे.

कांदा निर्यातबंदी घटनाक्रम...

तारीख...निर्णय/घडामोड

-७ डिसेंबर...३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी

-१८ फेब्रुवारी...निर्यातबंदीसंबंधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत चर्चा

-२० फेब्रुवारी...३१ मार्चपर्यंत निर्यातबंदी कायम; सरकारची माहिती

-१ मार्च...राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित (एनसीइएल) यांच्याद्वारे बांगलादेशसाठी ५० हजार टन तर युएईसाठी १४,४०० टन प्रति तीन महिन्यांनी ३६०० टन कांदा निर्यातसंबंधी अधिसूचना

-२२ मार्च...निर्यातबंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम

Onion Export Ban
Onion Export Ban : अखेर बांगलादेशात कांदा निर्यातीसाठी अधिसूचना जारी

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

कांदा निर्यातबंदी मागे घेण्याबाबत शेतकरी व शेतकरी संघटनांचा कायम पाठपुरावा होता. गेल्या तीन महिन्यात अनेक आंदोलनेही झाली. मात्र असे असताना या अधिसूचनेने केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अडचणीत ढकलले आहे.

सध्या बाजारात लेट खरीप कांद्याची आवक सुरू आहे. त्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढत असताना पुरवठा संतुलित झाला आहे. निर्यात संधी नसल्याने दरात क्विंटलमागे पाचशे रुपयांपर्यंत पडझड झाली आहे. त्यात केंद्राच्या या निर्णयामुळे पुन्हा कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

मागील सहा महिन्यांत कांदा उत्पादकांचे हजारो कोटींचे नुकसान झाल्यानंतर यापुढेही कांद्याची दर घसरण सुरूच राहील. शेतकऱ्यांचे आणखी कोट्यवधींचे नुकसान होईल. केंद्र सरकारने कुठल्याही अटी-शर्तींशिवाय कांदानिर्यात खुली करावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीत शेतकरी मतदानातून याचे उत्तर देतील.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, कांदा उत्पादक संघटना.
लोकसभेच्या निवडणुका समोर ठेऊन शेतकऱ्याला मारण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. ३१ मार्चनंतर शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील, अशी अपेक्षा होती; मात्र केंद्राच्या अधिसूचनेमुळे अपेक्षांवर पाणी फिरले आहे. शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर पाय द्यायचा हे सरकारचे धोरण आहे.
- संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com