Maharashtra Sugar Update: गेल्या आठवड्यापासून अवास्तव वाढणाऱ्या साखरेच्या दराला अखेर ब्रेक लागला आहे. ६००० रुपये प्रति क्विंटलच्या वर गेलेले साखरेचे दर झपाट्याने खाली येत ५५०० रुपयांपर्यंत स्थिर झाले. केंद्राने आयातीचा निर्णय घेतल्यानंतर तसेच अनेक ठिकाणी साखर कारखान्यांच्या तपासण्या सुरू झाल्यानंतर दरात उतार पाहावयास मिळाल्याची माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. .अलीकडील सत्रांमध्ये साखरेच्या दरात झालेल्या तीव्र वाढीनंतर प्रत्यक्ष बाजारातील मागणी त्या तुलनेत वाढली नाही. त्यामुळे खरेदीदारांनी सावध भूमिका घेतल्याने प्रमुख बाजारपेठांमध्ये साखरेच्या दरात क्विंटलमागे सुमारे ५०० रुपयांपर्यंत मोठी घट झाली..Sugar Prices: सरकारच्या उपाययोजनेनंतरही साखरेचे किरकोळ दर वाढलेलेच, नेमकं कारण काय?.कोल्हापूर बाजारपेठेत एस-ग्रेड साखरेचा दर सध्या ५३०० ते ५३६० रुपये प्रति क्विंटल आहे. मागील सत्राच्या तुलनेत दरात सुमारे २५० ते ३०० रुपयांची घट झाली आहे. मुजफ्फरनगर बाजारपेठेत एम-ग्रेड साखरेचे दर ५५८० ते ५६४० रुपये प्रति क्विंटल असून, येथेही दरात सुमारे ३०० ते ३५० रुपयांची घसरण झाली. अलीकडील दरवाढीनंतर बाजारात खरेदीदारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष भौतिक मागणी अपेक्षेइतकी वाढली नसल्याने तेजीला आधार मिळाला नाही. परिणामी, व्यापारी आणि औद्योगिक खरेदीदारांनी नवीन खरेदी करताना सावध पवित्रा घेतला आहे..Maharashtra Sugar Prices: साखर दरवाढीला साठेबाजी जबाबदार.दरम्यान, केंद्र सरकारच्या साखर आयातीच्या निर्णयामुळे आगामी काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढण्याची शक्यता आहे. आयातीमुळे पुरवठा वाढण्याच्या अपेक्षेने बाजारातील तेजीवर दबाव निर्माण झाला आहे. अलीकडील तेजीच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांनीही ‘थांबा आणि पाहा’ अशी भूमिका घेतल्याचे चित्र आहे. कमकुवत भौतिक मागणी, आयातीमुळे वाढण्याची शक्यता असलेली उपलब्धता आणि अलीकडील तेजीमुळे सावध झालेली खरेदी, या तीन प्रमुख घटकांमुळे नजीकच्या काळात देशांतर्गत साखर बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे..किरकोळ बाजारात दर चढेचघाऊक बाजारात दर घटले असले तरी किरकोळ बाजारात मात्र अद्याप वाढलेले दर तसेच कायम असल्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी ७० ते ७५ रुपये किलो दराने साखरेची विक्री सुरू आहे..या सर्व खेळास केंद्र शासन जबाबदार आहे. साखरेचे दर अनैसर्गिकरित्या वाढलेले आहेत. काही राज्यांमध्ये बहुतांशी कारखान्यांनी केंद्राने दिलेली कोटे विक्रीची मर्यादा पाळली नाही. यामुळे अशी परिस्थिती उद्भवली. अनेक ठिकाणी कारखानदारच व्यापारी असल्याने दुहेरी फायदा मिळवण्याचा प्रयत्न झाला. काही साखर चोरट्या मार्गाने देशाबाहेर गेल्याचीही शक्यता आहे.राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.