
अमरावती : कापूस आणि सोयाबीनच्या परदेशी मालाची आयात बंद (Cotton Soybean Import) करण्याची मागणी महाराष्ट्र किसान सभेच्या (Kisan Sabha) वतीने पंतप्रधानांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
केंद्र सरकारने कापूस आणि सोयाबीनची आयात केल्याने कापसाचे भाव १२ हजारांवरून सात हजारांपर्यंत पडले. तीन लाख टन कापसाच्या गाठी आयात करण्यात आल्या. परिणामी देशांतर्गत भाव गडगडले.
कृषी अवजारे, खते, रासायनिक खतांवर जीएसटी लावण्यात आल्याने उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
कापूस व सोयाबीनची आयात थांबवावी, शेती आधारित वस्तू जीएसटीमुक्त कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देताना अशोक सोनारकर, जे. एम. कोठारी, उमेश बनसोड, शरद मंगळे, जगदीश आत्राम, आदींचा समावेश होता.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.