Kharif Pulses Sowing Report: देशात यंदा खरीप कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. २८ ऑगस्टपर्यंत कडधान्यांची पेरणी १११.४६ लाख हेक्टरवर झाली असून, मागील वर्षी याच काळात हे क्षेत्र १०९.६२ लाख हेक्टर होते. यंदा क्षेत्रात १.६८ टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र मॉन्सून हंगामातील कमी पावसामुळे कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे..यंदा मॉन्सूनचे आगमन उशिरा झाल्याने खरीप पेरणी खोळंबली होती. त्यानंतर जुलैमध्ये पश्चिम आणि मध्य भारतात पावसाने काहीशी सुधारणा केल्याने पेरणीला वेग आला. मात्र अनेक भागांत पावसाचे वितरण असमान राहिले. तसेच विविध भागांत ढगाळ वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे खरीप उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Pulses Sowing : देशात कडधान्यांचा पेरा किंचित वाढला, राज्यात मात्र घट; कमी पावसाचा फटका बसण्याची शक्यता .तुरीच्या पेरणीत किंचित वाढदेशात यंदा कमी पावसामुळे शेतकऱ्यांनी कडधान्य पिकांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे तुरीखालील क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. यंदा देशात तुरीची पेरणी ४४.५९ लाख हेक्टरवर झाली असून, मागील वर्षी हे क्षेत्र ४४.३१ लाख हेक्टर होते. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये तुरीच्या क्षेत्रात घट झाली आहे..महाराष्ट्रात तुरीची पेरणी ११.९८ लाख हेक्टरवर झाली असून, मागील वर्षी हे क्षेत्र १२.१७ लाख हेक्टर होते. म्हणजेच महाराष्ट्रातील क्षेत्रात १.५६ टक्क्यांची घट झाली आहे. कर्नाटकात तुरीचे क्षेत्र १२.६३ लाख हेक्टर असून, मागील वर्षीच्या १४.१६ लाख हेक्टरच्या तुलनेत तब्बल ११ टक्क्यांनी घट झाली आहे. मध्य प्रदेशातही तुरीचे क्षेत्र १५ टक्क्यांनी घटून २.७४ लाख हेक्टर झाले आहे..Pulse Crops Sowing: मराठवाड्यात तूर, मूग, उडदाची अपेक्षित पेरणी नाही.उडीद आणि मुगाचा पेराउडदाच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात उडदाचे क्षेत्र ६१ टक्क्यांनी वाढून ६.१४ लाख हेक्टर झाले आहे. राजस्थानमध्ये २७ टक्के, तर मध्य प्रदेशात १९ टक्क्यांनी क्षेत्र वाढले आहे. मात्र, महाराष्ट्रात उडदाचे क्षेत्र ४७ टक्क्यांनी घटून १.९८ लाख हेक्टर झाले आहे. दुसरीकडे, मुगाच्या क्षेत्रात घट झाली आहे. .महाराष्ट्रात मुगाचे क्षेत्र ३० टक्क्यांनी घटून १.४७ लाख हेक्टर झाले आहे. कर्नाटकात ७.१४ टक्के, तर राजस्थानमध्ये १.५ टक्क्यांची घट झाली आहे. यंदा कडधान्यांच्या पेरणी क्षेत्रातील तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली असली, तरी असमान पाऊस आणि उशिराची पेरणी यामुळे हेक्टरी उत्पादकता घटण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस कमी राहिल्यास तूर आणि इतर कडधान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.