Khandesh Banana Farming: खानदेशात वादळ, नैसर्गिक आपत्ती यामुळे केळी उत्पादन कमी झाले आहे. यात केळीची आवक मागील महिन्याच्या तुलनेत निम्मीच असून, केळी दर कमाल २९०० रुपये प्रति क्विंटलवर पोचले आहेत. किमान दरही १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. .केळीची आवक सध्या खानदेशात १६० ते १७६ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) मे च्या मध्यात खानदेशात केळी आवक ३४० ट्रकपेक्षा अधिक होती..Banana Crop Damage: जळगाव जिल्ह्यात वादळामुळे केळीचे मोठे नुकसान.मागील महिन्यात केळीला सरासरी १६०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. मागील महिन्यात अनेक दिवस केळीचे कमाल दर २३०० रुपये प्रति क्विंटल असे होते. तर किमान दर ११००, १२०० व १५०० रुपये प्रति क्विंटल असे होते..Banana Crop Damage: वादळी वाऱ्यात केळीच्या बागा भुईसपाट.मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरातही केळीचे कमाल दर २९०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत. तेथेही केळीची आवक घटून ८० ट्रक (एक ट्रक १६ ते २० टन क्षमता) एवढी राहिली आहे. खानदेशसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुरात केळीची मोठी हानी मागील १५ ते २० दिवसांत वादळी पावसात झाली आहे..केळी भुईसपाट झाल्याने आवकेतही घट झाली आहे. तसेच अर्ली मृग बहर केळीची काढणी मे च्या मध्यापर्यंत पूर्ण झाली आहे. खानदेशात आता केळी आवक आणखी कमी होईल. आगाप कांदेबाग केळीत निसवण सुरू आहे. या बागांतून केळीची काढणी जुलैत सुरू होईल. पुढील ३० ते ४० दिवस केळी आवक सतत कमी होईल, असे संकेत जाणकारांनी दिले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.