Heatwave Impact on Poultry Farming: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या तापमानाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणावर लेयर कोंबड्यांची मरतूक झाल्याने अंड्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. परिणामी, बाजारात अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरात सुधारणा झाली आहे. .सध्या अंड्यांचे घाऊक दर प्रति शेकडा ७०० रुपये १० पैशांपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी हेच दर सुमारे ६५० रुपये प्रति शेकडा होते. विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी अंड्यांचे दर ३५० रुपये प्रति शेकड्यापर्यंत घसरले होते..Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार .पोल्ट्री क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक भागांत उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे लेयर कोंबड्यांची मोठ्या प्रमाणावर मरतूक झाली. त्यामुळे अंडी देणाऱ्या कोंबड्यांची संख्या घटली असून उत्पादनावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. साधारणपणे ९० टक्क्यांपर्यंत असलेले अंडी उत्पादन उष्णतेमुळे ६० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. परिणामी बाजारातील पुरवठा घटला असून मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी पडत आहे..पोल्ट्री व्यावसायिकांच्या मते, महाराष्ट्रात दररोज सुमारे एक कोटी अंड्यांची मागणी असते. मात्र, उत्पादन घटल्याने ही मागणी पूर्ण करणे कठीण जात आहे. त्यामुळे घाऊक बाजारात दर वाढले असून, किरकोळ बाजारात अंडी डझनाला १०० रुपयांनी विकली जात आहेत. किरकोळ स्तरावर एका अंड्याचा सरासरी दर ९ रुपये असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले..दरवाढीमागे केवळ उत्पादनातील घट हेच कारण नसून खाद्यखर्चातील वाढही महत्त्वाची ठरत आहे. कोंबड्यांच्या खाद्यातील प्रमुख घटक असलेल्या सोयापेंडचा दर ३५ ते ४० रुपये प्रति किलोवरून ७० रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. तसेच मक्याचा दर १८ रुपयांवरून २५ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोल्ट्री उत्पादकांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे..Poultry Production Reduction: पोल्ट्री उत्पादनात २५ टक्के कपातीचा निर्णय.दरम्यान, लेयर फार्मची पुनर्बांधणी करण्यासाठीही वेळ लागत आहे. एक दिवसांच्या पिलांना सध्या मोठी मागणी असून त्यांचाही तुटवडा जाणवत आहे. पिलांसाठी सुमारे तीन महिन्यांचे वेटिंग असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. तसेच, पिलाला अंडी उत्पादनासाठी सक्षम होण्यास सुमारे सहा महिने लागतात. त्यामुळे सध्याची उत्पादनातील तूट भरून निघण्यासाठी आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे..पिलांच्या तुटवड्यामुळे पुरवठाही कमीपोल्ट्री क्षेत्रातील जाणकारांच्या मते, लेयर कोंबड्यांची मरतूक, उत्पादकतेतील घट, खाद्यखर्चातील वाढ आणि पिलांच्या तुटवड्यामुळे अंड्यांचा पुरवठा मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळातही अंड्यांचे दर चढेच राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.