Ratnagiri News : जिल्ह्यातील सर्वांत मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या हर्णे बंदारातील मासे लिलावाला नुकतीच सुरुवात झाली असून मासळीची विक्री होत असली तरीही म्हाकूळचा दर कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे मच्छीमारांमध्ये निराशा आहे.
गतवर्षीचा माल अजूनही शिल्लक असल्यामुळे यंदा निर्यात कमी झाली असून स्थानिकपातळीवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातून रोजची मासळी खरेदी-विक्री आणि इतर उद्योग मिळून दररोज एक कोटींची उलाढाल होते.
मागील महिन्यात विविध कारणांमुळे थांबलेली मासेमारी पुन्हा सुरू झाली आहे. सध्या मच्छीमार समुद्रात जाऊ लागल्यामुळे किनाऱ्यावर विक्रेत्यांची लगबग सुरू झाली आहे. हर्णेतील लिलाव सुरू झाल्यामुळे खरेदी-विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे.
सध्या बांगडा, म्हाकूळ बऱ्यापैकी मिळत आहेत. पण त्याला अपेक्षित दर नाही. बांगडा ३० ते ३५ रुपये किलो, तर म्हाकूळ १९० रुपये किलो दराने विकले जात आहे. गतवर्षी म्हाकूळचा दर २५० रुपये किलो होता. त्यामुळे मच्छीमारांमध्ये निराशा आहे.
- मासळीच दर
मासे किलोचे दर (रुपये)
* सुरमई ६०० ते ८००
* पापलेट १०००
* बांगडा ३० ते ३५
* म्हाकूळ १९०
* मोठा बळा १९०
* छोटा बळा ७० ते ८०
* छोटी वाघटी ३०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.