
Amaravati News : वरुड तालुक्यात २०२४-२५ या वर्षाकरिता सीसीआयमार्फत कापूस खरेदी करण्यात आली. त्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण करण्यात आले. याला सर्वस्वी जबाबदार सीसीआयचे अधिकारी असून त्यामुळे शासनाचा कापूस खरेदीचा उद्देश यशस्वी झाला नसून शेतकऱ्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप होत आहे.
कापूस खरेदी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, याकरिता महाप्रबंधक भारतीय कापूस निगम लि. अकोला, जिल्हा उपप्रबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे तक्रार केलेली आहे.
सीसीआयने वरुड तालुक्यात कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांकडून मार्च, एप्रिल २०२५ मध्ये रुईचा उतारा नियमाप्रमाणे ३४.२५ किलो आवश्यक असताना ढगा येथील कापूस खरेदी केंद्रावर रुईचा उतारा शेतकऱ्याकडून प्रतिक्विंटल ३६ किलो घेण्यात आला. ज्या कापसाचा उतारा ३६ किलो नाही, तो सर्व कापूस परत करण्यात आला.
या केंद्रावर शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल दोन किलो सूट बळजबरीने घेण्यात आली. शेतकऱ्यांना ब्लॅकमेल करून तुमचा कापूस चांगला नाही, तुम्हाला क्वालिटी डिडक्शन द्यावेच लागेल, अशी भूमिका सीसीआयने वापरून शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल दोन किलोची सरासरी सूट घेतली, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
या खरेदी केंद्रावर ९० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. यावरून आपल्याला लुटीचा आकडा काढता येईल तसेच या केंद्रावर शेतकऱ्यांकडून कापूस गाडी मोजण्याचे पैसे घेतले आहे, ते नियमबाह्य आहे.
ती रक्कमसुद्धा शेतकऱ्यांना परत करावी व न्याय द्यावा तसेच दोषींवर कार्यवाही करावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेते दिलीप भोयर, बाजार समिती सभापती नरेंद्र पावडे, भूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे दीपक देशमुख, स्वप्नील खांडेकर, राहुल चौधरी, युवराज कराळे, अनिल वानखडे यांनी दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.