
Red Chili Rate : भारताने लाल मिरची उत्पादन आणि निर्यातीत चांगली कामगिरी केली. भारताची मिरची निर्यात २०१७-१८ ते २०२१-२२ या काळात २५ टक्क्यांनी वाढली. तर उत्पादनात ७.३ टक्क्यांनी वाढ झाली, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत दिली.
यासंदर्भात खासदारांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. मंत्री पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७-१८ मध्ये भारतातून ४ लाख ४३ हजार टन लाल मिरची निर्यात झाली होती.
तर २०२१-२२ मध्ये ५ लाख ५७ हजार टनांची निर्यात झाली. म्हणजेच या पाच वर्षांतील काळात देशातून मिरची निर्यात २५ टक्क्यांनी वाढली.
मिरची उत्पादनाबाबत माहिती देताना मंत्री पटेल म्हणाल्या की, मागील पाच वर्षांतील काळात देशातील मिरची उत्पादन ७.३३ टक्क्यांनी वाढले.
देशात २०१७-१८ मध्ये देशात १७ लाख १० हजार टन उत्पादन झाले होते. तर २०२१-२२ मधील उत्पादन १८ लाख ३६ हजार टन मिरची उत्पादन झाले होते.
यंदा उत्पादनात घट
देशात मिरची उत्पादनात तेलंगणा आघाडीवर आहे. महाराष्ट्रातही नंदूरबारसह काही जिल्ह्यांमध्ये मिरची उत्पादन होते. मिरची पिकावर यंदाही तुडतुड्यांचा प्रादुर्भाव जाणवला. त्यामुळं यंदाही उत्पादनात मोठी घट आल्याचे शेतकरी सांगत आहेत.
शेतकऱ्यांना एकरी सरासरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. पण यंदा उत्पादन १० ते १२ क्विंटलपर्यंतच स्थिरावल्याचे शेतकरी सांगत आहेत. तसेच अनेक भागातील शेतकऱ्यांनी ८० टक्क्यांपर्यंत माल विकला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.