
Sangli News : श्रावणामुळे खाऊच्या पानांच्या मागणी वाढल्याने दरातही पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना किंचित दिलासा मिळाला आहे. गणपती उत्सवामुळे पानांच्या मागणीत वाढ होऊन दरही वाढतील आणि ते टिकून राहतील, अशी शक्यता पान उत्पादकांनी वर्तविली आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बाजारात खाऊच्या पानांची मागणी वाढली आहे. त्यामुळे पान उत्पादक पानाचा खुडा बाजारपेठेतील मागणीनुसार करू लागले असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात फाफडाला ४००० ते १२ हजार रुपये, कळी पानाला २००० ते ८००० रुपये (एक डाग) असा दर मिळाला होता.
त्यानंतर अधिक महिना आल्याने बाजारपेठेत पानांची मागणी कमी झाली होती. त्याचा परिणाम दरावरही झाला होता. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात फाफडा पानाला ३००० ते ५००० तर कळी पानाला २००० ते ३५०० रुपये (एक डाग) असा दर मिळाला होता.
पंढरपूर, सोलापूर, कोकणासह अन्य बाजारपेठांतून श्रावण महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी वाढली आहे. पानांची आवकही चांगली होत आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे.
सध्या फाफडा पानाला ३५०० ते ८००० तर कळी पानाला २५०० ते ४५०० रुपये (एक डाग) असा दर मिळत आहे. अर्थात गेल्या महिन्यात दर पाच ते दहा टक्के वाढले असल्याचे पान उत्पादकांना सांगितले. श्रावण संपल्यानंतर लगेच गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यामुळे या सणानिमित्त पानांच्या मागणीत वाढ होऊन दरात वाढ होईल, अशी आशा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.