लागवडीनंतर ६ आठवड्यांनी नत्राचा दुसरा हफ्ता प्रतिहेक्टरी युरिया १०० किलो याप्रमाणात द्यावा. निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे. पिकास ८ - १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सिंचन करताना मोठे वाफे किंवा पाडगे यामध्ये न देता सरळ पद्धतीने द्यावे. कारण, त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय न होता उपलब्ध पाण्यात अधिक दिवस सिंचन करणे सोपे जाते. खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी द्रावण पोंग्यात पडेल अशी फवारणी करावी. फवारणी प्रतिलिटर पाणी, क्विनॉलफॉस २ मि.लि. गावाजवळील पांढरीच्या जमिनीत लोहाच्या कमतरतेमुळे पीक पिवळे किंवा पांढरे पडते. अशाठिकाणी ०.५ टक्के फेरस सल्फेटची (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) फवारणी करावी. उसपीक जमिनीवर लोळू नये यासाठी मोठी बांधणी वेळेवर करावी. वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकावर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. पांढरी माशी उसाच्या शेंड्यावरील पानांवर अंडी घालते. अंडी घालण्याचे प्रमाण दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानांवर अधिक असते. तिचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करावे. प्रादुर्भावग्रस्त पाने माशीची अंडी व कोषासहित तोडून जमिनीत पुरून टाकावीत. तसेच उसाचे पीक ४ ते ५ महिन्यांचे होईपर्यंत शेतातील अतिप्रादुर्भावग्रस्त काळे कोष असलेली उसाची पानेदेखील काढून टाकावीत. फवारणी प्रतिलिटर पाणी क्लोरपायरीफॉस १ मि.लि. कीडग्रस्त शेतात पिवळे चिकट सापळे (ग्रीस लावलेले) लावावेत. सापळे वाऱ्याच्या दिशेने ठेवल्यास पांढऱ्या माशीची मादी आकर्षित होऊन त्यास चिकटते. त्यामुळे शेतातील किडीच्या मादीची संख्या कमी होण्यास मदत होते. नत्रयुक्त खताच्या अतिवापराने किडीच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. म्हणून रासायनिक खतांचा संतुलित प्रमाणात वापर करावा. लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसत असल्यास नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. प्रादुर्भाव सुरवातीला कमी क्षेत्रावर अाणि कडेने जास्त असल्यास जास्त प्रादुर्भाव असलेली उसाची पाने किडीच्या अवस्थेसह काढून बांधावर जाळून टाकावीत. मावाग्रस्त पाने (हिरवी व काेरडी) एका शेतातून दुसऱ्या शेतात नेऊ नयेत. फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी क्लोरपायरीफॉस २ मि.लि. अधिक उसाची तोडणी तीक्ष्ण धारेच्या कोयत्याने जमिनीलगत करावी. ऊसतोडणीनंतर वरंब्याच्या बगला नांगराच्या साह्याने फोडून घ्याव्यात. त्यानंतर पुन्हा सऱ्या पाडाव्यात. उसतोडणीनंतर १५ दिवसांनी हेक्टरी ७५ किलो नत्र, ११५ किलो स्फुरद व ११५ किलो पालाश सरीमध्ये देऊन पाण्याची पाळी द्यावी. उसतोडणीनंतर ४५ दिवसांनी नत्राचा दुसरा हफ्ता हेक्टरी ७५ किलो युरियाद्वारे द्यावा. खोडवा साडेचार महिन्याचा झाला असल्यास हेक्टरी १०० किलो नत्र युरियाद्वारे देऊन पक्की बांधणी करावी. पाण्याच्या पाळ्या १० दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात. पाण्याची कमतरता असल्यास वाळलेले गवत, उसाचे पाचट इत्यादींचा आच्छादन म्हणून वापर करावा किंवा एक आड एक सरी पाणी द्यावे. काणी रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास रोगग्रस्त झाडांची बेटे मुळासकट खोदून नष्ट करावीत. बेटे शेताबाहेर नेताना कापडी पिशवीत घालून न्यावीत म्हणजे रोगकारक बियाणे उडून इतर ऊस पिकावर पडत नाहीत. संपर्क : डॉ. यू. एन. आळसे, ७५८८०८२१३७ (कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी)