महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेनी, लोनचे, बार, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे. काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. महाराष्ट्र शासनाच्या फळबाग लागवड योजनेमुळे काजू पिकाखालील क्षेत्र वाढत आहे. महाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू टरफलापासून तेल काढणे असे प्रक्रिया उद्योग सुरू असले तरी सुमारे ९० टक्के काजूची बोंडे फेकून दिली जातात. काजू बोंडामध्ये पाणी ८७.९ टक्के, प्रथिने ०.२ टक्के, स्निग्ध पदार्थ ०.१ टक्के, पिष्टमय पदार्थ ११.६ टक्के, व क जीवनसत्च २६८ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम फळात असते. शिवाय कॅल्शियम फॉस्फरस व लोह इ. खनिजद्रव्ये थोड़या प्रमाणात असतात. वाया जाणाऱ्या काजू बोंडापासून सिरप, नेक्टर, जॅम, चटणी, कॅन्डी, सरबत, स्कॅश, टॉफी, काजू फेनी, लोनचे, बार, बर्फी, पावडर असे अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे शक्य आहे.
काजूगर निर्मिती काजू बीवर प्रक्रिया करून पिवळसर पांढऱ्या रंगाचे काजूगर मिळतात. मार्च ते मे या कालावधीत उपलब्ध होणाऱ्या काजूवर वर्षभर प्रक्रियेसाठी काजू बिया वाळवून योग्य प्रकारे साठवणे गरजेचे असते. बियांपासून काजूगर मिळविण्यासाठी त्या वाफाळणे, थंड करणे, विशिष्ट कटरचा वापर करून त्यावरील टरफल वेगळे करणे. काजूगरावरील साल (टेस्टा) काढण्यासाठी नियंत्रित तापमान ठेवून वाळविणे, विशिष्ट धारदार संयंत्र वापरून टेस्टा बाजूला करणे, प्रतवारी, योग्य आर्द्रता राखण्यासाठी कंडिशनिंग करणे या प्रक्रियांचा समावेश होतो. पॅकींगसाठी निर्वात पोकळी व नायट्रोजन फ्लशिंग पद्धतीचा वापर करावा.
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थ सरबत
सिरप काजू बोंडापासून रस काढून घ्यावा. १ किलो रसासाठी २ किलो साखर व ३० ग्रॅम सायट्रिक आम्ल एकत्र मिसळून साखर विरघळेपर्यंत गरम करावे. मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. नंतर त्यामध्ये सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक ७१० मिलिग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात मिसळावे. अशा प्रकारे तयार केलेला सिरप निर्जंतुक केलेल्या बाटलीत भरावा. नंतर बाटल्यांना झाकण लावून हवाबंद कराव्यात. बाटल्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात. काजू सिरपमध्ये त्याच्या चार पट या प्रमाणात पाणी मिसळून काजू सरबत तयार करून आस्वाद घ्यावा.
स्कॅश
चटणी चटणी तयार करण्यासाठी प्रथम काजू बोंडाच्या १ किलो गरामध्ये १ किलो साखर व ६० ग्रॅम मीठ मिसळून एकत्र ठेवावे. त्यानंतर वेलची १५ ग्रॅम, दालचिनी २० ग्रॅम, लाल मिरची पूड २० ग्रॅम, आले १५ ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा ५० ग्रॅम व लसूण २० ग्रॅम हे सर्व मसाले एकत्र बारीक करून ते मलमलच्या कापडात बांधून पुरचुंडी तयार करून ती उकळत ठेवलेल्या मिश्रणात सोडावी. मिश्रण जॅमप्रमाणे घट्ट झाल्यावर ती पुरचुंडी काढून घ्यावी. त्यात ८० मि.ली. व्हिनेगार व २५० मिलिग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात सोडियम बेंझोऐट हे परिरक्षक मिसळावे. थोडा वेळ उकळून घ्यावे. अशाप्रकारे तयार केलेली चटणी गरम असतानाच निर्जतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांत भरुन त्यावर पातळ मेणाचा थर द्यावा. बाटल्यांना झाकणे लावून त्या थंड व कोरड्या जागी ठेवाव्यात.
जॅम
संपर्क- सचिन शेळके, ८८८८९९२५२२ (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गिनबॉटम कृषि, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तरप्रदेश)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.