बांगलादेश सरकारने भारताकडून एक लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात तांदळाचा तुटवडा पडला आहे.
तांदळाची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी बांगलादेशची भारतावर भिस्त आहे. बांगलादेशकडून मागणी वाढल्यामुळे भारतीय तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.
बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या अन्न महामंडळाने भारत सरकारसोबत तांदूळ खरेदी करार केला आहे.
या करारानुसार बांगलादेश सरकार ४२२ डॉलर प्रति टन दराने (वाहतूक खर्च वगळता) भारताकडून उकडा तांदूळ खरेदी करणार आहे. बांगलादेश सरकार भारताखेरीज दक्षिण-पूर्व आशियायी देशांतूनही तांदूळ खरेदी करणार आहे.
यावर्षी बांगलादेशात प्रतिकूल हवामानामुळे भाताच्या पिकाला फटका बसला आहे. तिन्ही हंगामात तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेख हसीना सरकारने देशात तांदळाचा पुरेसा साठा करण्यासाठी कंबर कसली आहे.
अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) मते बांगलादेश यावर्षी ६.५ लाख टन तांदूळ आयात करण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षेचा विचार करून बांगलादेश सरकारने तांदळावरील आयातशुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.