मागील आठवड्यामध्ये राज्यातील जालना, कडवंची भागामध्ये गारपीट झाली. या भागातील द्राक्षबागांचे बरेच नुकसान झाले. आता पुढील काळात सर्वच द्राक्ष विभागामध्ये वातावरण सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. कोणत्याही भागामध्ये पाऊस किंवा ढगाळ वातावरणांची फारशी शक्यता नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. पुढील दहा ते पंधरा दिवसांत काढणीला आलेल्या द्राक्षांना कोणताही धोका नाही.
काढणीला आलेल्या द्राक्षांच्या घडावर, मण्यावर किंवा देठांवर भुरीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास या वेळी कोणत्याही बुरशीनाशकांचा वापर करू नका. त्याऐवजी बॅसीलस सबटिलीस या सारख्या जैविक घटकांचा वापर करून भुरी नियंत्रित करावी. मण्यावर व घडावर छाटणीनंतरच्या ६०-६५ दिवसांनंतर आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर केलेला असल्यास विश्लेषणामध्ये त्याचे उर्वरीत अंश निश्चित दिसू शकतील. विशेषतः जर वाढत्या मण्यावर फ्लुसीलॅझोल वापरलेले असल्यास त्याचे उर्वरीत अंश कदाचित एमआरएल (०.१ पीपीएम ) पेक्षा जास्तसुद्धा राहू शकतील. अशा परिस्थितीमध्ये शेवटचा उपाय म्हणून जैविक नियंत्रक घटकांचा वापर फवारणीसाठी करावा. कोणत्याही कीटकनाशकाचे रेसिड्यू एमआरएल पेक्षा थोड्या प्रमाणात जास्त आढळले असल्यास ते वेगाने कमी करण्यासाठी मण्यावर जैविक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या बुरशीजन्य (ट्रायकोडर्मा) किंवा जिवाणूजन्य (बॅसिलस सबटिलीस) घटकांचा वापर उपयोगी ठरेल. घडांवर पेपर लावलेला असल्यास, तो काढून घेऊन मण्यावर जैविक नियंत्रणाचा वापर करावा. असे केल्याने मण्यावरील उर्वरित अंश कमी होतील.
गारपीट झालेल्या भागांसाठी काही विशेष सूचना
टीप ः वरील पदार्थांना लेबल क्लेम नसल्याने त्याचा वापर स्वतःच्या जबाबदारीवर सावधानतेने किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा. सद्यपरिस्थितीमध्ये कोणताही पर्याय नसल्यामुळेच हा उपाय सूचवित आहोत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.