
Animal Husbundery : गायी, म्हशीपासून जास्त दूध उत्पादन मिळविण्यासाठी त्या योग्य वेळी आटविल्या म्हणजे योग्य वेळी भाकड केल्या पाहिजेत. गाय, म्हैस नेमकी कोणत्यावेळी भाकड करावी? गाय, म्हैस योग्यवेळी भाकड केल्यास कोणते फायदे होतात. याविषयीची माहिती पाहुया.
गाय, म्हैस भाकड करण्याची योग्य वेळ
गाय म्हैस ज्यावेळेस सात महिन्याची गाभण असते तेंव्हा तिला पहिल्यांदा भाकड करावे. यासाठी पहिल्यांदा गायी, म्हशींला पाण्याचा आणि खाद्याचा ताण द्यावा. म्हणजे काय करायचं तर खाद्य आणि पाणी गायी, म्हशीला जेव्हड रोज दिलं जातं त्यापेक्षा ते कमी द्यायच. यामुळे गायी, म्हशींच दूध देण्याचे प्रमाण कमी होईल. दिवसातून एक वेळा दूध काढावे. परत हळूहळू एक दिवसाआड दूध काढावं. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी एकदाच दूध काढाव.
या पद्धतीचा वापर केल्यास गाईच्या दुधाचे प्रमाण कमी होते. यानंतर गाय, म्हैस आपोआप दूध देण्याच बंद करते. या व्यवस्थापनातन गाय, म्हैस भाकड करता येते. भाकड केल्यानंतर कासदाह होऊ नये म्हणून भाकड करण्याच्या शेवटच्या दिवशी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने चारही सडांमध्ये प्रतिजैविकांच्या ट्यूब भराव्यात. त्यामुळे विण्याआधी किंवा विल्यानंतर कासदाह होत नाही. गाईच्या गाभण काळात गर्भाची वाढ पहिले सात महिने हुळावर होते.
नंतरच्या तीन महिन्यात ती झपाट्याने म्हणजे पहिल्या सहा महिन्याच्या वाढीपेक्षा तिप्पट होत असते. याच काळात पुढील दूधवाढीच्या दृष्टीनेही जादा शक्तीचा संचय करुन ठेवण्याची गरज असते. कासेतील पेशीचे पुनरुज्जीवन याच काळात होते. म्हणूनच गाईच्या गाभण काळाच्या शेवटच्या आठ आठवड्यातील जादा वाढीव खुराकाला महत्व आहे. त्यामुळेच याकाळात गायी, म्हशीला जास्त खुराका देण्याच नियोजन करावं.
गाय, म्हैस योग्यवेळी भाकड केल्यामुळे कोणते फायदे होतात?
गाय म्हैस योग्यवेळी भाकड केल्यामुळे कासेला आराम मिळून दूध पेशींचे पुनरुज्जीवन केले जाते. त्यामुळे शेवटच्या महिन्यात कासेची वाढ चांगली झपाट्याने होते. मिळणारे दूध पहिल्या वेतापेक्षा जास्त असते. या सर्व कारणांसाठी विण्यापुर्वी दोन महिने आगोदर गाय, म्हैस भाकड करावी. गाय म्हशीमध्ये भाकड काळ हा साधरणपने दोन महिने ठेवणे आर्थिकदृष्ट्या फयदेशीर ठरते.
गाय म्हैस भाकड करण्याचा मख्य उद्देश म्हणजे शेवटच्या तीन महिन्यात गर्भाची वाढ झपाट्याने होते. यात तिला स्वत:च्या पोषणाबरोबरच गर्भाचे पोषण आणि कासेत दूध तयार करण्यासाठी लागणारे अन्नघटक यामुळे तिच्या शरीरावर पोषणद्रव्याचा ताण पडतो. त्यामुळे गाय, म्हैस अशक्त होते. त्यामुळे याच काळात जनावरांना पोषक खाद्यघटकांचा पुरवठा करणं गरजेच आहे. म्हणून दुधातून निचरा होणारे क्षार आणि जीवनसत्वयुक्त आहार सक्तीच्या भाकड काळात द्यावा. गाभण असताना तसेच त्यानंतर भरपूर दूध देण्याच्या कालावधीत संतुलित पुरक खाद्याचा गरजेनूसार पुरवठा करावा.
-----------
माहिती स्त्रोत - क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.