
योजनेचे नाव- कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
लाभार्थी-
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.
- वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे इतकी असावी.
- भूमिहीन शेतमजूर असल्यास स्त्रिया/ विधवा स्त्रिया व अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अनुसूचित जातीतील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येईल
लाभाचे स्वरूप- दोन एकर ओलिताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन असल्यास ५० टक्के अनुदान व ५० टक्के बिनव्याजी कर्ज स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे –
- विहित नमुन्यातील अर्ज फोटोसह भरावा.
- अर्जदार अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याचा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड झेरॉक्स
- आधारकार्ड, मतदान कार्ड, भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला
- मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला
- वय ६० वर्षाखालील असल्याचा वयाचा पुरावा
- लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्याबाबत विहित प्रमाणपत्र
- शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्याचा १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र
संपर्क- जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय
वेबसाईट- https://sjsa.maharashtra.gov.in
राज्यात राहणार्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून भूमिहीन शेतमजूरांसाठी राज्य सरकारने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.