
बरेचदा घरी दही लावताना किंवा लावल्यानंतर ते चांगले जमत नाही. विशेषतः भांड्यात वर दही असते आणि खाली आंबट पाणी असते. दह्याला जळकट किंवा धुरकट वास येतो. हे टाळण्यासाठी आणि उत्तम दही तयार होण्यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.
- दूध गरम करताना ते चुलीवर केल्यास निघणारा धूर दुधात मिसळून दुधाला धुराची चव येते.
- दूध गरम करतेवेळी हलवल्यामुळे किंवा भांड्याचा बूड पातळ असल्यास भांड्यास खाली दूध चिकटून ते जळून जळका वास येतो.
- दूध पूर्णपणे न तापविल्यास.
- दूध जास्त गरम किंवा थंड असताना त्यात विरजण घातल्यास.
- विरजण लावलेल्या दुधास कोमट जागी न ठेवता थंड जागी ठेवल्यास.
- विरजण अयोग्य प्रमाणात लावल्यास.
- विरजण जुने किंवा खराब असल्यास.
- अस्वच्छ भांड्यात विरजण लावल्यास.
दही बनविण्याच्या प्रक्रियेत वापरले जाणारे विरजण महत्त्वाची भूमिका बजावते. चांगल्या, शुद्ध विरजणात फक्त दुधातील शर्करेचे लॅक्टिक आम्लात रूपांतर करणारे सूक्ष्म जिवाणू असतात. जे दुधाचे दह्यात रुपांतर करत असतात. वरील पैकी कोणत्याही कारणांनी दही लागण्याची प्रक्रिया बिघडून व्यवस्थित दही तयार होत नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.