

विमा काढलेल्या जनावरांच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे नियमानुसार बंधनकारक असते. त्याशिवाय कोणतीही विमा कंपनी नुकसानभरपाई देत नाही. नैसर्गिक आपत्ती जसे वीज पडणे, पुराच्या पाण्यात बुडणे व वाहून जाणे, जळणे किंवा गारपिटीमुळे मृत्यू झाल्यास, ते शवविच्छेदन करूनच सिद्ध करता येते. त्यानंतर मिळणारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आवश्यक असतो. जनावरांच्या विविध शारीरिक तपासण्या आणि लक्षणांच्या साहाय्याने पशुवैद्यक योग्य अंदाज बांधून उपचार करतात. परंतु, बरेच आजारी जनावरांमध्ये एकसारखी लक्षणे दाखवतात, तर काही आजार कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये आजाराचे योग्य निदान होत नाही. योग्य उपचार न मिळाल्यामुळे जनावरे दगावण्याची शक्यता असते. आजार संसर्गजन्य असल्यास बाकी जनावरांना याचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. हे रोखण्यासाठी मृत जनावरांचे शवपरीक्षण करून आजाराचे निदान करणे महत्त्वाचे आहे.
संपर्क ः डॉ. भुपेश कामडी, ७५८८२२६०१८ डॉ. विठ्ठल धायगुडे, ९०८२२९२३४१ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.