
Animal Health Care : उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान (Body Temprature) वाढते. हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी जनावरे शरिरक्रियेचा वेग वाढवून शरीरातील उष्णता शारीराबाहेर टाकतात.
त्यामुळे शरीर क्रियेवर ताण पडतो त्याचा परिणाम म्हणून तापमान नियंत्रणासाठी जनावरे पाणी अधिक पितात व चारा किंवा खाद्य कमी खातात. साधारणतः जनावरांचे आरोग्य जेंव्हा चांगले असते अशावेळेस देशी गाईचे कमाल तापमान ९५ अंश फॅरेनहाईट असते.
उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या अती प्रखर किरणाच्या संपर्कामुळे किंवा पिण्याच्या पाण्याची कमतरता तसेच पन्हाळी किंवा सिमेंटच्या जी आय शीट पत्र्याचा वापर केलेल्या एकाच गोठ्यात जास्त जनावरांना एकत्र बांधून गर्दी केल्यास उष्माघाताचा (HeatStroke) त्रास होऊ शकतो
गायीपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास अधिक होतो
गाईपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात.
सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते.
याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात.
माजावर असलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. म्हशींना पाण्यात डुंबण्यास द्यावे, ही त्यांची नैसर्गिक आवड आहे, त्यामुळे शरीराचे तापमान योग्य राखले जाते.
म्हशींच्या अंगावर पडेल अशी पाण्याच्या फवाऱ्यांची व्यवस्था करावी, अशी व्यवस्था नसल्यास दिवसातून तीन-चार वेळा त्यांना पाण्याने धुवावे.
दुपारच्यावेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत, या वेळेला ती सावलीत असणे गरजेचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.