योगेश रामदास घुले
योगेश रामदास घुले  
यशोगाथा

एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर

ज्ञानेश उगले

शेतकरी ः योगेश रामदास घुले गाव ः गिरणारे (ता. जि. नाशिक) पीक ः टोमॅटो   नाशिक जिल्ह्यातील गिरणारे परिसरात टोमॅटो हे मुख्य पीक आहे. टोमॅटोसाठी खरीप हंगाम सर्वांत महत्त्वाचा असतो. येथेच टोमॅटो मार्केट असून देशभरातील व्यापारी खरेदीसाठी हंगामात इथे येतात. त्यामुळे टोमॅटो पीक येथील शेतकऱ्यांसाठी इतर पिकांच्या तुलनेत अधिक सोयीचे बनले आहे. योगेश घुले दरवर्षी खरीप हंगामात टोमॅटोची तीन एकर क्षेत्रावर लागवड करतात. १ ते १५ जुलै या कालावधीत बियाणे टाकले जाते. बियाणे टाकण्याआधी गादी वाफ्यावर कुजलेले शेणखत, कंपोस्ट खत, निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट ही खते जमिनीमध्ये मिसळली जातात. त्यानंतरच बी टाकले जाते. १५ ऑगस्टच्या दरम्यान लागवड होते. खत व्यवस्थापनात सेंद्रिय, रासायनिक, जैविक या सर्व पद्घतींचा एकात्मिक स्वरूपात अवलंब केला जातो.

  • रोपे २१ दिवसांची झाल्यानंतर सरीवर रोपांची पुनर्लागवड केली जाते. दोन सरीतील अंतर ५ फूट तर रोपांतील अंतर हे २ फूट ठेवले जाते.
  • लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी ह्युमिक अॅसीड अाणि १९:१९:१९ हे विद्राव्य खत एकत्र मिसळून रोपांच्या मुळालगत ड्रेंचिंग केले जाते. त्यानंतर रोपांच्या खोडाला मातीचा थर दिला जातो.
  • लागवडीनंतर ८ ते १० दिवसांच्या दरम्यान एका एकराला कुजलेले शेणखत + १२:३२:१६ हे मिश्र खत ५० किलो + एकत्रित सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा एकत्रित डोस दिला जातो. त्यानंतर हलकी मशागत करून सरी सपाट केली जाते.
  • लागवडीच्या २० ते २५ दिवसांदरम्यान पुन्हा सरी फोडण्यासाठी २४:२४:०० हे खत एकरी १०० किलो याप्रमाणे दिले जाते. त्याचा उपयोग फुले व फळाधारणा वाढविण्यासाठी होतो. लागवडीच्या ३५ ते ४० दिवसांदरम्यान १०:२६:२६ या खतांचा एकरी १०० किलो या प्रमाणे डोस दिला जातो.
  • - रोपांच्या पुनर्लागवडीनंतर सुरवातीपासूनच १९:१९:१९, १२:६१:००, १३:००:४५, ००:००:५०, ००, ००: ५२: ३४ या विद्राव्य खतांच्या ग्रेडस दिल्या जातात. ही खते प्रामुख्याने ठिबक सिंचनातून दिली जातात.
  • एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्यांची फवारणी केली जाते. जसे फळ पक्वतेच्या वेळी कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशिअम सल्फेट या खतांचा वापर केला जातो.
  • शेणखत, वरखते, विद्राव्य खते असा प्रतिएकर टोमॅटोसाठी एकंदर ४० ते ४५ हजार रुपये खर्च येतो. टोमॅटोला प्रतिएकराला १ लाख ते १ लाख २५ हजार रुपये खर्च येतो. त्यात जवळपास ४० टक्के खर्च हा खत व्यवस्थापनावर होतो.
  • खतांचा एकात्मिक आणि संतुलित वापराचा फळाच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम दिसून येतो.
  • संपर्क ः योगेश घुले, ९७६७३७३३९७  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

    Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

    Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

    Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

    Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

    SCROLL FOR NEXT