Rain Update Agrowon
हवामान

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Team Agrowon

Pune News : राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा चटका कायम असल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे आहे. मॉन्सूनची परतीची वाटचाल सुरू असतानाच, राज्यात पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पश्चिम बंगाल आणि परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले असून, पश्चिम बंगालमध्ये समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. काही ठिकाणी पहाटेच्या धुके आणि वेळी दव पडत आहे.

शनिवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी येथे ३६ अंश सेल्सिअस, तर अकोला, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ येथे तापमानाचा पारा पस्तिशीपार आहे. आज (ता. ६) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे. तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा अंदाज :

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर.

३५ अंशांपेक्षा अधिक तापमान असलेली ठिकाणे :

नागपूर ३६.४, ब्रह्मपुरी ३६, अकोला ३५.३, चंद्रपूर ३५.२, वर्धा ३५.२, भंडारा ३५, यवतमाळ ३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

SCROLL FOR NEXT