Climate Change Agrowon
हवामान

Weekly Weather : हवामान बदलाने तापमानात वाढ शक्य

Weather Update : फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात होणारी वाढ ही केवळ हवामान बदलानेच शक्य आहे.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१४ हेप्टापास्कल इतके अधिक हवेचे दाब राहणे शक्य आहे. त्यानुसार थंडीत वाढ अपेक्षित आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने या आठवड्यासाठी दिलेल्या कमाल व किमान तापमानाच्या आकडेवारीनुसार कमाल व किमान तापमानात वाढ होणे शक्य आहे. अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल व किमान तापमानात होणारी वाढ ही केवळ हवामान बदलानेच शक्य आहे.

मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, पश्‍चिम विदर्भातील वाशीम व पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात हवामान ढगाळ राहणे शक्य आहे. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहणे शक्य आहे. त्यामुळे या भागांत थंडीचे प्रमाण कमी होईल. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होईल. त्यामुळे पिकांची, जनावरांची पाण्याची गरज वाढेल.

प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. तर हिंदी महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३०.२ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे ‘एल निनो’ अथवा ‘सुपर एल निनो’चा प्रभाव राहणार नाही. तसेच बंगालच्या उपसागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २८ अंश सेल्सिअस व अरबी समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे चक्रीयवादळांची शक्यता नाही. या वर्षी उन्हाळी हंगाम लवकर सुरू होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे.

कोकण :

कमाल तापमान रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील सर्व जिल्ह्यांत किमान तापमान १९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ टक्के इतकी अधिक राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी जिल्ह्यात ६१ टक्के, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ४० ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २० ते २८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. हवामान थंड व कोरडे राहील

उत्तर महाराष्ट्र :

नाशिक, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. तर जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक जिल्ह्यात ३६ टक्के, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २६ ते २९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मराठवाडा :

कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. मात्र धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे हवामान दुपारी उष्ण व कोरडे राहील. किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर जालना व बीड जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर लातूर व नांदेड जिल्ह्यांत ते २१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व लातूर जिल्ह्यांत ४८ टक्के, तर नांदेड, बीड,

परभणी, हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३१ ते ३४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. तर वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अमरावती जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर वाशीम जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील.

वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ताशी ७ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ :

कमाल तापमान नागपूर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ३१ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २३ ते २५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात १७ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान गडचिरोली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३० ते ३६ टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २५ ते २६ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कोल्हापूर, सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. तर सातारा व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर पुणे, सातारा जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील.

सांगली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ६३ टक्के राहील. तर उर्वरित जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ६ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला :

- उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होण्यासाठी ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

- हरभरा पिकात पक्षिथांबे तयार करावेत.

- कडधान्य पिकांत पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.

- उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान करावी.

- फळपिकांच्या नवीन लागवड केलेल्या रोपांना पाणी देण्याची व्यवस्था करावी.

- कुक्कुटपालन शेडमध्ये पाण्याची भांडी वाढवावीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT