There will be a panchnama on paddy loss
There will be a panchnama on paddy loss 
मुख्य बातम्या

पेण ः भातशेती नुकसानीचे पंचनामे होणार

टीम अॅग्रोवन

पेण ः ऐन दिवाळीत पेणमध्ये दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने अनेकांची तारांबळ उडाली. कापून ठेवलेले भाताचे पीक भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले असतानाच खाडीलगत असणाऱ्या बंधाऱ्याचे दरवाजे तुटले. यात खाडीतील खारे पाणी शेतामध्ये शिरल्याने शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेले. या दोन्ही नैसर्गिक संकटाच्या चक्रव्यूहात शेतकरी सापडला असतानाच कृषी अधिकाऱ्यांनी तहसीलदारांसोबत चर्चा करून नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

पेण तालुक्यातील सरेभाग, वाशी, शिर्की, वढाव परिसरातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान झाले आहे. पहिल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे झालेले नुकसान आणि दुसऱ्या दिवशी पावसासह खाडीला आलेल्या उधाणामुळे बंधाऱ्याचे दरवाजे तुटल्यामुळे शेतामध्ये ठेवलेली भातपिके संपूर्ण भिजून हजारों रुपयांचे नुकसान झाले आहे. या दोन्ही संकटांचा सामना ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना करावा लागल्यामुळे सरकारने तत्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजन झेमसे यांनी केली आहे.   

येत्या दोन दिवसांत उघाडी आणि तुटलेल्या दरवाजाची पाहणी करून ती सुस्थितीत बसवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.  अर्जुन कोळी , खारभूमी अधिकारी, पेण 

अवकाळी पावसामुळे भाताचे नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदारांसोबत चर्चा करून त्यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार आहेत.

अनिल रोकडे , कृषी अधिकारी, पेण  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT