संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला चालना शक्य ः विनय सहस्त्रबुध्दे

टीम अॅग्रोवन

नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर आहे. मात्र नारळ वगळता इतर टाकाऊ घटकांवर प्रक्रिया होत नसल्याने संधी असूनही दुर्लक्ष झाले. आंध्र प्रदेश, केरळ वगळता इतर राज्यांमध्ये याबाबत मोठे काम उभे राहिलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नारळ उत्पादनाचा आढावा घेतल्यास काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला नवी चालना मिळणे शक्य असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केले. 

सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या कॉयर बोर्डाची बैठक शुक्रवारी (ता.३) झाली. या वेळी राज्यसभा प्रतिनिधी म्हणून श्री. सहस्त्रबुद्धे सहभागी झाले होते. या वेळी त्यांनी हे व्यक्त केले. बैठकीला कॉयर बोर्डाचे अध्यक्ष सुधीर गर्ग, केरळ सरकारच्या प्रतिनिधी अंजू जॉर्ज, सदस्य प्रभू सुंदर राजन, गोविंद नटराजन आदी सहभागी होते.

सहस्त्रबुद्धे म्हणाले, की फक्त ४१ टक्के नारळातील टाकाऊ घटक सोडणं काथ्या तयार करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात कोकणामध्ये अवघ्या १६ सोडणं या टाकाऊ घटकांचा वापर होतो. त्यामुळे देशासह राज्यात याबाबत जनजागृती नसल्याने महत्त्वाचा घटक उपयोगात येत नाही. काथ्यापासून सतरंज्या, पायपुसणी उत्पादित होतेच; मात्र आता विटाही बनतात. रस्ताबांधणीत त्याचा उपयोग करण्याचे धोरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारले आहे. काथ्या उद्योगावर भर दिल्यास रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. याबाबत तळकोकणात उद्योग उभे राहिले, तर रोजगार वाढेल, असा दावा त्यांनी केला.    प्रशिक्षण केंद्राची केली मागणी  कॉयर बोर्डाकडे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची मागणी श्री. सहस्त्रबुद्धे यांनी केली. या माध्यमातून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने काम उभे केले जाईल. यातून नारळ उत्पादक, बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण व रोजगारनिर्मितीसाठी मार्गदर्शन मिळेल. निसर्ग चक्रीवादळामुळे जे नुकसान झाले आहे. या प्रयोगातून येथे पुनर्वसन शक्य होईल, असे त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT