झाडाला लगडलेल्या भाज्या खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
झाडाला लगडलेल्या भाज्या खराब होण्याचा धोका निर्माण झाला आहे.  
मुख्य बातम्या

भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम; रोपांच्या मागणीवर परिणाम

Raj Chougule

कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला उत्पादक मोठ्या तोट्यात गेल्याने नव्याने लागवडीबाबत त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील रोपवाटिकांकडे राज्यभरातून येणाऱ्या भाजीपाला रोपांच्या मागणीवर परिणाम झाला आहे. अनेक शेतकरी नियोजित भाजीपाला लागवड रद्द करत असल्याने सध्याचे प्लॉट संपल्यानंतर भाजीपाल्याची मोठी चणचण भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. साधारणतः जूननंतर बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावेल, अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे रोपवाटिकांमध्येही परिस्थिती बिकट बनली आहे. कामगार नसल्याने रोपांचे व्यवस्थापन करणे अशक्‍य बनले आहे. बियाणे, कोकोपीट उपलब्ध होत नसल्याने येत्या काही काळात रोपे तयार करणे अशक्‍य असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले. 

यासर्वांचा एकत्रित परिणाम नव्या लागवडींवर होणार आहे.  ‘कोरोना’च्या प्रादुर्भावाच्या शक्‍यतेने देशभर लॉकडाऊन सुरु आहे. घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा अनियमित आहेत. यातच मोठे हॉटेल, उपाहारगृहे बंद असल्याने घाऊक प्रमाणात जाणाऱ्या भाजीपाल्याला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पाच ते दहा एकरांपर्यंत भाजीपाला उत्पादन घेणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. मजूर नाहीत, त्यातच मालाला उठाव व दर नाही. यामुळे ढोबळी मिरचीसारखा भाजीपाला शेतातच खराब होत आहे. कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती तर अधिकच बिकट बनली आहे.

लाखो रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला आहे. यामुळे ‘पुढची लागवड राहू द्या, आता काय करायचे’, याच विचारात भाजीपाला उत्पादक आहे. सध्याच्या प्लॉटला भवितव्य नसल्याने पट्टीचे भाजीपाला उत्पादकही हादरले आहेत. विक्रीची व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. यामुळे पंधरा ते वीस वर्षांपासून सलग भाजीपाला घेणाऱ्या उत्पादकांनीही येत्या काही महिन्यांत नव्या लागवडीचा विचार बाजूला ठेवला आहे. शेतकऱ्यांची ही सार्वत्रिक भावना असल्याने भाजीपाला लागवडीची गती अत्यंत मंद राहील अशी शक्‍यता आहे. मी अनेक वर्षांपासून ढोबळी मिरची करतो. चार ते पाच एकरांवर ढोबळीचे पीक प्रत्येक वर्षी असतेच. दर जरी कमी असला तरी मालाचा उठाव होत असल्याने प्रत्येक वर्षी कमी-जास्त प्रमाणात रक्कम हाती येते. ‘कोरोना’च्या दणक्‍याने यंदा मात्र मी हतबल झालोय. उपाहारगृहे, पंचतारांकित हॉटेल्स बंद असल्याने ढोबळी मिरचीला मागणी थांबली आहे. उत्पादन आताच सुरु झालेय. एवढ्या मोठ्या प्रमाणात घरगुती विक्रीही शक्‍य नाही. भाजीपाल्याचा दीर्घ अनुभव असूनही येत्या काही महिन्यांत भाजीपाला लागवडीचा मला पुनर्विचार करावा लागेल अशी चिन्हे असल्याचे उदगाव येथील संजय मादनाईक यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT