महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 
मुख्य बातम्या

...त्यानंतर बँका, कार्यालयांमध्ये ७/१२ घेऊन जाण्याची गरज नाही : महसूल मंत्री थोरात

टीम अॅग्रोवन

कडेगाव, जि. सांगली  ः राज्यात ऑनलाइन सातबारा आणि खाते उताऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, ते लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सातबारा उतारा घेऊन जाण्याची गरज नाही. ज्या कार्यालयात शेतकऱ्यांचे काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाइन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

सांगली येथे शुक्रवारी (ता. १४) पत्रकारांशी बोलताना मंत्री थोरात यांनी ही माहिती दिली. या वेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, काँग्रेसचे सांगली शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.

मंत्री थोरात म्हणाले, की महापूर, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना मदत व नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. मात्र ती मिळण्यात काही अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सूचना दिल्या आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे, यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे प्रयत्नशील आहेत. मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी डॉ. कदम गाववार आढावा, तसेच मंगळवारी (ता. १८) सांगली येथे बैठक घेतील. सांगली हा स्वतंत्र तालुका व्हावा अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. सांगली तालुका निर्मितीसाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊ असे मंत्री थोरात यांनी या वेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT