डॉ. प्रा. एन.डी. पाटील
डॉ. प्रा. एन.डी. पाटील 
मुख्य बातम्या

ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू : डॉ. प्रा. एन.डी. पाटील

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी रविवारपूर्वी (ता. २२) करावी, अन्यथा या कालावधीनंतर सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा इशारा ज्‍येष्‍ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांनी दिला.

ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यांसह विविध मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सर्वपक्षीय शेतकरी मेळावा आयोजित केला होता. या वेळी मार्गदर्शन करताना डॉ. पाटील बोलत होते.

ते म्हणाले, की महापुराच्या काळात भाजप शिवसेनेच्या युती सरकारने अनेक घोषणा केल्या. मात्र यापैकी अनेक घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. शासन कानाडोळा करीत असेल, तर जनता कधी क्षमा करीत नाही. नव्या सरकारने वेळीच सावध व्हावे. शेतकरी आत्महत्या करीत असताना, केवळ सहानुभूती दाखवण्याचा प्रयोग मागील शासनाला भोवला आहे. 

पूर ओसरून चार महिने झाले तरी, अद्यापही महावितरणकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे नाहीत. ही खेदाची बाब आहे. अधिवेशन असल्यामुळे या सरकारला २२ डिसेंबरपर्यंतची मुदत देत आहोत. या मुदतीत या मेळाव्यातील मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या न्यायहक्‍काकरिता मी पुन्हा रस्त्यावरची लढाई लढणार आहे. याची दखल शासनाने घ्यावी, असा इशारा डॉ. पाटील यांनी या वेळी दिला.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, प्रताप होगाडे, अरुण लाड, महादेव धनवडे, बाबासाहेब देवकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील आदींची या वेळी भाषणें झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT