गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्यामुळे सहा तालुक्यांतील धान व इतर पिके पाण्याखाली गेली होती. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात पुरामुळे २०,२३१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील संजय सरोवर व गोसीखुर्द धरणाचे पाणी २८ ऑगस्टपासून सोडण्यात आले. गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने पाण्याचा मोठा विसर्ग होता. या पुराचा फटका देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा व चामोर्शी या तालुक्यांना बसला. या सहा तालुक्यातील खरीप हंगामातील धान व इतर पिके पाण्याखाली आली. काही घरांची पडझड झाली. तसेच पशुधन मृत्युमुखी पडले. गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील प्रमुख दहा मार्ग चार दिवस बंद होते.
परिणामी वाहतूक ठप्प झाली होती. शेतकरी, व्यावसायिक, पशुपालक या सर्वांना पुराचा फटका बसला. प्रशासनाच्या वतीने बाधित क्षेत्रात सर्वेक्षण पंचनामे करण्यात आले. या नुकसानीच्या भरपाईपोटी २३ कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. दोन हजार कोंबड्या मृत्युमुखी गोसेखुर्द धरणातून पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी या तीन तालुक्यांत २११३ कोंबड्या मृत्युमुखी पडल्या. त्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१०, मुलचेरातील १२४५ व आरमोरी तालुक्यातील ५५८ कोंबड्यांचा समावेश आहे. याशिवाय दहा दुधाळ जनावरे दगावली तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
असे आहे नुकसान (हेक्टर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.