मोर्शी तालुक्‍यातील कपाशीला वगळले पीक सर्वेक्षणातून !
मोर्शी तालुक्‍यातील कपाशीला वगळले पीक सर्वेक्षणातून ! 
मुख्य बातम्या

मोर्शी तालुक्‍यातील कपाशीला वगळले पीक सर्वेक्षणातून !

टीम अॅग्रोवन

अमरावती ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश स्पष्ट असतानासुद्धा मोर्शी तालुक्‍यात चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे  कापूस उत्पादक भरपाईपासून वंचित राहण्याची भीती वर्तविली जात आहे. विमा लाभसुद्धा  या शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाच्या या धोरणाविषयी तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.  गतवर्षीच्या तुलनेत संत्रा, कपाशीचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्याने शेतकरी आधीच विवंचनेत आहेत. त्यात १८ ते २८ ऑक्‍टोंबर या कालावधीत झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या सर्वेक्षणाचे स्पष्ट आदेश शासन परिपत्रकात होते. तरीदेखील मोश्री तालुक्‍यातील खरीप पिकांचे पंचनामे करताना कपाशीला वगळण्यात आले. कपाशीला वगळून फक्‍त सोयाबीन व ज्वारीच्या पिकाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामुळे कापूस उतपादक शेतकरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून; तसेच विमाभरपाईपासून वंचित राहणार आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या व तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी संयुक्‍तरीत्या केलेल्या सर्वेक्षणात फक्‍त सोयाबीन व ज्वारी या दोनच पिकांचा समोवश होता; परंतु सर्वेक्षणाकरिता शासकीय कर्मचारी शेतावर गेले असता शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी काढणी, होऊन घरात पोचले होते. नेमके त्याचवेळेस शेतात उभ्या असलेल्या कपाशीच्या पिकाचे सर्वेक्षण न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही. कृषी विभागाने केलेल्या प्रचंड जागृतीच्या परिणामी, शेतकऱ्यांनी कपाशीचा विमा काढला; परंतु नुकसान सर्वेक्षणातून कपाशीलाच वगळण्यात आल्याने कापूस उत्पादकांना विमाभरपाई मिळणार नसल्याचे सांगितले जाते. मोर्शीलगतच्या इतर तालुक्‍यातील सर्वेक्षणामध्ये सोयाबीन, ज्वारीसह कपाशीचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT