माहिती अधिकार कायद्यात बदल म्हणजे जनतेशी धोका ः अण्णा हजारे
माहिती अधिकार कायद्यात बदल म्हणजे जनतेशी धोका ः अण्णा हजारे 
मुख्य बातम्या

माहिती अधिकार कायद्यात बदल म्हणजे जनतेशी धोका : अण्णा हजारे

टीम अॅग्रोवन

राळेगणसिद्धी, जि. नगर : माहितीचा अधिकार कायद्यात केंद्र सरकारने बदल करणे हा जनतेशी धोका आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. राळेगणसिद्धी येथे मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन हजारे यांनी माहितीचा अधिकार कायद्यातील प्रस्तावित बदलांबाबत भूमिका मांडून केंद्र सरकारवर नाराजी प्रकट केली. 

अण्णा हजारे म्हणाले, ‘‘कायदे जरी लोकसभा, विधानसभेत बनत असले तरी कायद्याचा मसुदा बनविताना जनतेची प्रतिक्रिया घेतली पाहिजे. कारण हे लोकतंत्र आहे. कायदा व कायद्याचा मसुदा दोन्ही सरकारांनी बनविणे ही लोकशाही नाही ते तर इंग्रजांचे हुकूमतंत्र आहे,’’ अशा शब्दांत अण्णांनी सरकारला फटकारले. 

माहितीचा अधिकार कायदा बनविण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर पहिले जनआंदोलन केले. त्यानंतर १९९९ आणि २००६ मध्ये आंदोलने केली. मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांबरोबर चार वेळा बैठका झाल्या. महाराष्ट्रामध्ये २००३ मध्ये माहिती अधिकार कायदा तयार झाला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारने २००५ मध्ये त्या मसुद्याच्या आधाराने संसदेमध्ये माहिती अधिकार कायदा केला. या कायद्यामुळे गैरप्रकारांना चपराक बसली. सन २००६ मध्ये हा कायदा बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र ९ ऑगस्ट २००६ रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या समाधिस्थळी आळंदीत आंदोलन केले. परिणामी, सरकारला कायद्यात बदल न करण्याचे लेखी आश्‍वासन द्यावे लागले, असेही ते म्हणाले. 

आजही आंदोलनाचा निर्धार  हजारे म्हणाले, ‘‘या कायद्यातील कलम ४ प्रमाणे सर्व संस्थांनी कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर (ऑनलाइन) टाकली असती, तर या कायद्याचा दुरुपयोग झाला नसता. परंतु कायदा बनून १४ वर्षे झाले, तरी कलम ४ ची योग्य अंमलबजावणी होत नाही. तसे न करता कायद्यात बदल करण्याचा सरकारचा विचार आहे. हे लोकशाहीला घातक आहे. आतापर्यंत देशासाठी १९ वेळा उपोषण केले. जनता या कायद्यासाठी रस्त्यावर उतरणार असेल, तर आपली आणखीही उपोषणाची तयारी आहे.’’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT