‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’ 
मुख्य बातम्या

‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’

टीम अॅग्रोवन

नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या नुकसानचीच्या भरपाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर यांच्या अध्यक्षतेत ही सभा झाली. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी दुष्काळ आणि उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे फळबागांच्या झालेल्या नुकसानीचा मुद्दा मांडला. त्यांनी संत्रा मोसंबीच्या बागांची अवस्था, त्यामुळे संत्रा बागायतदारांचे झालेले नुकसानीची स्थिती मांडली. अशा अवस्थेत शेतकरी जगावा याकरिता १०० टक्‍के नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी त्यांनी सभागृहाला केली. माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले म्हणाले, की जिल्हा परिषदेने या संदर्भात सभागृहात ठराव घेऊन तो शासनाकडे पाठवावा. संत्र्यांच्या करपलेल्या बागा संदर्भातील स्थिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजू हरणे यांनी मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिली. काटोल, कळमेश्‍वर, नरखेड भागांत मोठ्या प्रमाणात संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. अर्थ सभापती उकेश चव्हाण म्हणाले, पाऊस लांबल्यामुळे संत्रा, मोसंबीची झाडे मरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. परिणामी, वाढीव आणि भरीव मदत शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. कॉँग्रेसच्या काळात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. अशीच भरीव मदत शेतकऱ्यांना जाहीर व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. या वेळी नुकसानभरपाईच्या संदर्भात सभागृहात एकमताने मंजूर केलेला ठराव, शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती अध्यक्षा निशा सावरकर यांनी सभागृहाला दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT