Fifty-four lakh advance notice of affected farmers in Nanded district
Fifty-four lakh advance notice of affected farmers in Nanded district 
मुख्य बातम्या

नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पावणेचार लाख पूर्वसूचना

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवू खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे भरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन, ऑफलाइन, इमेल तसेच ॲपद्वारे तीन लाख ७१ हजार ६०३ पूर्वसूचना दाखल केल्या आहेत. यापैकी दोन लाख ८६ हजार ६१९ पूर्वसुचनांचे सर्वे झाले आहेत. तर अद्याप ८५ हजार पूर्वसुचनांवर सर्वे सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक मंडळांत अतिवृष्टी होऊन खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे लहान-मोठ्या नद्यांसह गोदावरी नदीला पूर आला. नदीकाठची पिके खरडून गेली. पाणी साचूनही पिके जळून गेली.

याबाबत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना इफ्को-टोकियो पीकविमा कंपनीकडे ७२ तासाच्या आत नुकसानीबाबत पूर्वसूचना दाखल करण्याचे आवाहन केले होते. या काळात ऑनलाइन पूर्वसूचना दाखल करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून नुकसानीबाबत ऑफलाइने पूर्वसूचना दाखल करण्याची मुभा दिली होती. यामुळे जिल्ह्यातील नुकसान झाल्याच्या तीन लाख ७१ हजार ६०३ पूर्वसूचना दाखल झाल्या आहेत. यातील दोन लाख ८६ हजार ६१९ ठिकाणी सर्वे झाले आहेत. तर ८५ हजार पूर्वसूचनांचे सर्वे येत्या काही दिवसांत होणार असल्याची माहिती विमा कंपनीकडून मिळाल्याचे कृषी विभागाने कळविले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT