विहीर अधिग्रहणासाठी कळंब येथे उपोषण
विहीर अधिग्रहणासाठी कळंब येथे उपोषण 
मुख्य बातम्या

विहीर अधिग्रहणासाठी कळंब येथे उपोषण

टीम अॅग्रोवन

खामसवाडी, जि. उस्मानाबाद : खामसवाडी गावासाठी मागणी प्रमाणे आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर न केल्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य गुरुवारपासून (ता. ११) उपविभागीय कार्यालय कळंब येथे उपोषणाला बसले आहेत.

उपविभागीय अधिकारी कळंब यांना १ ऑक्‍टोबरला लेखी निवेदन देऊन दाखल प्रस्तावाप्रमाणे खामसवाडी गावासाठी आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्याची मागणी केली होती.

अन्यथा ११ ऑक्‍टोबरपासून उपोषणाचा इशारा उपसरपंच प्रभाकर शेळके व अन्य सदस्यांनी दिला होता. प्रशासनाने मागणी व निवेदनाची दखल घेतली नाही. त्यामुळे गुरुवारपासून कळंब येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपसरपंच प्रभाकर शेळके, अंगद देवकर, सचिन शेळके, सरपंच पती संजय कोळी उपोषणास बसले आहेत. खामसवाडी गावात यंदा पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. जवळपास दहा हजार लोकसंख्येच्या या गावातील लोकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतने पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आठ विहिरींचे अधिग्रहण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे उपसरपंच शेळके यांनी सांगितले.

प्रशासनाने मात्र, त्यापैकी तीन विहिरींच्या अधिग्रहणाला मंजुरी दिली आहे. आठ विहिरींचे अधिग्रहण करून सोळा कूपनलिकाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन गाव पातळीवर ग्रामपंचायतीने केले आहे. प्रशासनाने यासाठी सहकार्य करण्याची गरज असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे उपोषणाचा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT