गाळप हंगाम
गाळप हंगाम  
मुख्य बातम्या

दिवाळीनंतरच गाळप हंगाम सुरू होण्याची शक्‍यता

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर : पूर परिस्थितीमुळे उसाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा साखर हंगाम लवकर सुरू करण्याची चर्चा असली तरी दिवाळीनंतरच कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. यातच निवडणुकीची धामधुमीमुळे अनेक कारखानदार निवडणुकीच्या कामात व्यस्त होण्याची शक्‍यता असल्याने धुराडी दिवाळीनंतरच पेटतील अशी शक्‍यता व्यक्त होत आहे.  यंदा महापुराने दक्षिण महाराष्ट्रातील उसाचे मोठे नुकसान झाले. पाणी ओसरल्यानंतर बुडालेल्या उसाचे शंभर टक्केपर्यंत नुकसान झाले. ज्या उसात बऱ्यापैकी पाणी गेले होते. तो ऊस काही दिवस चांगला राहील, असा अंदाज तज्ज्ञांचा होता. पुढील दोन महिन्यांत जर ऊस तातडीने गेला तर काही प्रमाणात उत्पादन हाती लागेल, असा अंदाज उस तज्ज्ञांचा होता.   कारखान्यांनी केलेल्या सर्व्हेक्षणातही या उसाबाबतचा तपशील आला होता. अनेक ऊस उत्पादकांनी कारखान्यांकडे उस लवकर गाळपास सुरू करावा ही मागणी केली होती. जर कालावधी वाढला तर बुडालेल्या उसाचे अधिक नुकसान होण्याची शक्‍यता गृहीत धरून कारखान्यांनी कारखाने लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली होती. परंतु, अद्यापही याबाबत अनेक कारखान्यांमध्ये फारसे धामधुमीचे वातावरण दिसून येत नसल्याचे चित्र आहे.  कारखाने लवकर सुरू केल्यास निकृष्ट उसाचे गाळप सुरवातीला होईल याचा तोटा कारखान्यांना होणार असल्याने कारखान्यांनी वेळेआधी ऊस तोडणीचे नियोजन काही कालावधीसाठी थांबविल्याची स्थिती आहे. मजुरांचे आगमन हे दिवाळीच्या दरम्यानच होणार असल्याने दिवाळीनंतरच पूर्ण क्षमतेते कारखाने सुरू होतील याचा अंदाज व्यक्त होत आहे. विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्याने याचा हंगामावरही काही अंशी परिणाम होणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील सुमारे नव्वद टक्के कारखानदार हे राजकारणाशी संबधित आहेत. अनेक कारखानादार या वेळी निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. कारखान्याचा अध्यक्ष उभा राहिल्यास त्याच्या प्रचाराच्या नियोजनासाठी संपूर्ण कारखान्याची यंत्रणा राबत असते. यामुळे आता कारखाना लवकर सुरू करण्याचे प्रयत्न होणार नाहीत, असा अंदाज कारखानादार सूत्रांनी व्यक्त केला.  हंगाम जानेवारी अखेरपर्यंतच? हंगाम कधीही सुरू झाला तरी यंदा कसा तर जानेवारीपर्यंतच चालेल अशी शक्‍यता आहे. प्रत्येक कारखान्यांच्या क्षेत्रातील सुमारे तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान झाल्याने हा फटका कारखान्यांना बसू शकतो. यामुळे जादा क्रशिग असणाऱ्या कारखान्यांना कमी क्षमतेवर कारखाने चालविण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT