Work plan to tackle scarcity in Aurangabad district
Work plan to tackle scarcity in Aurangabad district 
मुख्य बातम्या

औरंगाबाद जिल्ह्यातील टंचाई निवारण्यासाठी कृती आराखड्यावर मदार

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईचे निवारण करण्याची मदार जानेवारी ते जून २०२० दरम्यानसाठी तयार केलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर अवलंबून असणार आहे. तूर्त जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या पाच टॅंकरने पाणीटंचाईचे संकट कायम असल्याचे संकेत दिले आहेत. 

ऑक्‍टोबर महिन्यात अवेळीच्या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट यंदा नसेल असे सर्वांनाच वाटले. परंतु, पडलेला हा पाऊस सर्वदूर समान नसल्याने जिल्ह्यातील अनेक पाणीसाठ्यांची व भूगर्भाची तहान कायम राहिली. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण ६५ पैकी जवळपास २० ते २२ मंडळात गतपाच वर्षांत व यंदाही सरासरीइतका पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्याचा सरासरी पाऊस अपेक्षेच्या पुढे जाऊन दिसत असला, तरी प्रत्यक्षात काही भागात यंदा पाणीटंचाईला सामोर जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई भासू शकणाऱ्या ५६१ गावे व ५४ वाड्यांची संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी जानेवारी ते जून २०२० साठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. 

जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून २०२० अशा दोन टप्प्यांत या कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ३१८ गावे व ४४ वाड्यांसाठी ६५२ योजनांसाठी अंदाजे आवश्‍यक खर्च १६ कोटी ९९ लाख प्रस्तावित करण्यात आला. तर, दुसऱ्या टप्प्यात २४३ गावे व दहा वाड्यांच्या टंचाईच्या उपाययोजनांसाठी ४६० योजनांच्या पूर्ततेसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये खर्च,  दोनही टप्पे मिळून जानेवारी ते जून २०२० दरम्यान ५६१ गावे व ५४ संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठीच्या ९११२ प्रस्तावित योजनांसाठी २८ कोटी ८२ लाख ८५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

टॅंकरच्या फेऱ्या सुरू

औरंगाबाद तालुक्‍यांतर्गत येत असलेल्या सांजखेडा येथे पाणीटंचाई निवारण्यासाठी दोन टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय पैठण तालुक्‍यातील बालानगर येथे दोन, तर गंगापूर तालुक्‍यातील आंबेगाव, हैबतपूर व मुस्तफाबाद या तीन गावातील पाणीटंचाई निवारण्यासाठी एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT