शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस आठवले
शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस आठवले  
मुख्य बातम्या

शिवसेना नसली तरी रिपाई भाजपसोबत : रामदस आठवले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शिवसेनेने भाजप सोबत युती केली नाही तर शिवसेनेत मोठी फूट पडेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी याबाबत पुनर्विचार करावा. शिवसेनेने भाजपसोबत युती केली नाही तरी रिपाइं मात्र भाजपसोबत राहील, असे रिपाइं (आ.) गटाचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

नागपूर दौऱ्यावर असलेल्या रामदास आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, शिवसेनेचे संजय राऊत, सुभाष देसाई यांच्याशी आपण चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी या मुद्द्यावर शिवसेनेशी बोलावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर ही बाब टाकली आहे. ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत.

या वेळी रामटेक लोकसभा लढविणार १९९८ मध्ये आपण दक्षिण-मध्य मुंबईमधून निवडणूक जिंकलो होतो. या वेळी भाजप-शिवसेना युती झाली तर त्याच मतदारसंघातून लढण्याचा आपला विचार आहे. मात्र युती झाली नाही तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा आहे. आपण याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. मी विदर्भवादी आहे, त्यामुळे या मतदारसंघात मला विरोध होणार नाही, असा दावाही रामदास आठवले यांनी केला.

सर्व घटकांना जोडणार २७ मे रोजी पुणे येथे रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पुढील काळात दलितांसह ओबीसी, मराठा, मुस्लिम अशा सर्वच समाजातील घटकांना पक्षासोबत जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. या सर्वांना सोबत घेऊन गावागावात शाखा उघडण्यात येतील, असेही रामदास आठवले म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT