टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणार
टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणार 
मुख्य बातम्या

टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावर कधी येणार

टीम अॅग्रोवन

सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी घाटमाथ्यावर मिळत नसल्याने घाटमाथ्यावरील ऊस पिकासह द्राक्ष, भाजीपाला पिके संकटात आली आहे. गेली अनेक वर्षांपासून टेंभूचे पाणी घाटमाथ्यावर देण्याच्या केवळ घोषणाच केल्या जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून केलेल्या घोषणा कधी पूर्ण करणार असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

खानापूर तालुक्‍यातील भूड येथील टेंभूचा पाचवा टप्पा आहे. त्याठिकाणाहून खानापूर आणि तासगाव तालुक्‍याला पाणी देण्याचे नियोजन केले आहे. खानापूर तालुक्‍यातील बलवडी (खा.) या गावाच्या शिवारात टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्यापासून पाणी येणार आहे. याठिकाणी या योजनेची पाणी येणारी पाइपलाइन याठिकाणी आली असून डावा आणि उजवा कालवा केला जाणार आहे. मात्र, त्याठिकाणी कोणतेही अद्यापही सुरू नाही.

या ठिकाणाहून पळशी, हिवरे यासह अनेक गावांना पाणी मिळणार आहे. त्यानुसार भूड येथे काम अद्यापही अपूर्ण आहे. या टप्प्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय खानापूर आणि तासगाव तालुक्‍यांतील शेतीला पाणी मिळणार नाही. मात्र, हे काम पूर्ण करण्यासाठी केवळ घोषणाच केल्या जात आहेत. टेंभू उपसा सिंचन योजनेचे तासगाव तालुक्‍यातील लाभक्षेत्रात मिळतच नाही. त्यामुळे केलेल्या घोषणा कधी पूर्ण करणार, असा सवाल शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

अग्रणी नदी बारमाही करणे आश्‍वासनच नदी बारमाही करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला. गेली दोन वर्षांपासून ना सर्व्हे, ना अंदाजपत्रक याबाबत कोणतीच हालचाल नाही.

आश्‍वासनांची खैरात सुरू येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा घोषणांची खैरात सुरू केली आहे. सध्या भूड येथे खानापूर घाटमाथ्यावर पाणी देण्यासाठी पाइप आणल्या आहेत. कामाला गती देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी करत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मताचे राजकारण करण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याची कुजबूज शेतकऱ्यांच्यात सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT