बाजार समितीच्या काट्यात निघाली तूट; शेतकऱ्याची तक्रार
बाजार समितीच्या काट्यात निघाली तूट; शेतकऱ्याची तक्रार 
मुख्य बातम्या

बाजार समितीच्या काट्यात निघाली तूट; शेतकऱ्याची तक्रार

टीम अॅग्रोवन

अमरावती: घरुन मोजून आणलेली तूर बाजार समितीच्या इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर कमी भरली. याप्रकरणी चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी राहुल अहीर या शेतकऱ्याने केली आहे.  चांदूरबाजार येथील कनिराम अहिर यांनी २४ जानेवारीला आपली तूर चांदूरबाजार बाजार समितीत विक्रीसाठी पाठविली होती. बाजारात तूर  पाठविण्याआधी तिचे घरीच इलेक्‍ट्रॉनिक काट्यावर वजन करण्यात आले. १३ क्‍विंटल ३६ किलो असे या तुरीचे वजन होते. दुसऱ्या दिवशी तुरीचा लिलाव होऊन मोजमाप करण्यात आले. त्या वेळी कनिराम अहिर यांचा मुलगा राहुल उपस्थित होता. लिलावापासून ते मोजमापापर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर तुरीचे वजन त्यांना सांगण्यात आले. या वेळी ५१ किलो तूर कमी भरल्याची माहिती त्यांना देण्यात आली. या तुरेच बाजारमूल्य २ हजार ५०० रुपये आहे. घरून मोजून आणलेली तूर बाजार समितीच्या काट्यावर कमी भरल्याने शेतकरी राहुल अहिर यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार चार दिवसांनी बाजार समितीकडे दिली. त्याआधारे बाजार समिती प्रशासनाकडून नोंद घेत चौकशी सुरू केली आहे. खरेदीदार व शेतकऱ्याला समोरासमोर बसवून निर्णय घेतला जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Crop Insurance : सोयाबीन पिकाला विम्याचा लाभ मिळालाच नाही

Pre Kharif Review Meeting : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके नेमा

Sharad Pawar : सध्याचे केंद्रातील सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात: शरद पवार

Mumbai Weather : मुंबईसाठी २२ दिवस धोक्याचे

SCROLL FOR NEXT