राज्यात आजपासून पावसाचा अंदाज
राज्यात आजपासून पावसाचा अंदाज 
मुख्य बातम्या

राज्यात आजपासून पावसाचा अंदाज

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रातीन तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डीप्रेशन) आणि मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे गुरुवारपासून (ता. १५) राज्यात पावसाची शक्यता अाहे. तर रविवारपर्यंत (ता. १८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी राज्यात ढगाळ हवामान तयार झाल्याने अनेक ठिकाणी दुपारपासून अंधारून आले होते.

अरबी समुद्रात असलेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी सकाळी साडेआठ वाजता मिनिकाॅय बेटांपासून अग्नेय दिशेला १३० किलाेमीटर, तर तिरुअनंतपुरमच्या नैर्ऋत्य दिशेला ३४० किलोमीटर अंतरावर होते. ताशी १४ किलाेमीटर वेगाने वायव्येकडे सरकणारे क्षेत्राची तीव्रता गुरुवारपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतर ते निवळत जणाार आहे. अरबी समुद्रात कमी तीव्रतेच्या वादळाची शक्यताही मावळली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उच्चांकी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर बुधवारी दुपारनंतर असलेल्या ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उन्हाची ताप कमी झाली होती. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस पडणार असून, शुक्रवारपासून राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बुधवारी (ता. १४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.३, जळगाव ३८.६, कोल्हापूर ३५.७, महाबळेश्वर ३१.६, मालेगाव ३९.०, नाशिक ३६.५, सांगली ३७.०, सातारा ३५.७, सोलापूर ३८.४, मुंबई ३३.३, रत्नागिरी ३५.८, डहाणू ३२.७, भिरा ४१.०, औरंगाबाद ३६.६, परभणी ३८.४, नांदेड ३७.०, अकोला ३८.६, अमरावती ३७.६, बुलडाणा ३८.०, चंद्रपूर ३८.६, गोंदिया ३७.२, नागपूर ३८.५, वर्धा ३९.०, यवतमाळ ३७.५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT