आर्द्रता कमी होत आहे, निफाड ८.४ अंश
आर्द्रता कमी होत आहे, निफाड ८.४ अंश 
मुख्य बातम्या

आर्द्रता कमी होत आहे, निफाड ८.४ अंश

टीम अॅग्रोवन

पुणे : हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला आहे. पुढील आठवड्यापासून किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.४ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर व श्रीलंकेचा दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचे रूपांतर चक्राकार वाऱ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर अंतरावर आहे. लक्षद्वीपच्या परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तसेच राजस्थानच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. त्यामुळे राज्यातील थंडीत काही प्रमाणात चढउतार होत आहे. 

कोकणात थंडी गायब ः कोकणातील अनेक भागांत थंडीने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. मुंबई, अलिबाग, भिरा, डहाणू येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. रत्नागिरीतील किमान तापमान सरासरीएवढे होते. भिरा येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.  

मध्य महाराष्ट्रात थंडीत चढउतार :  मध्य महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. निफाड आणि जळगाव येथे सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली. पुणे, महाबळेश्वर येथील किमान तापमान सरासरीएवढे होते. कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा येथे थंडी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येते.

मराठवाड्यात किंचित थंडी ः  मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड येथे थंडी कायम आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते पाच अंशापर्यंत घसरला आहे. औरंगाबाद, येथे थंडीची तिव्रता कमी झाली आहे. परभणीच्या कृषी विद्यापीठाच्या परिसरात ८.६ अंश से्ल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद येथील किमान तापमान सरासरीएवढे होते.   

विदर्भात थंडीची लाट ः  उत्तरेकडून काही प्रमाणात थंड वारे विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात अजूनही आर्द्रता असल्याने थंडीने चांगलाच मुक्काम ठोकला आहे. अजून चार ते पाच दिवस थंडी कायम राहणार असून त्यानंतर किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. गोदियामध्ये ८.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वाशीम, ब्रह्मपुरी, वर्धा, यवतमाळ येथे थंडीने चांगलीच हुडहुडी भरविली आहे.  मंगळवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) : मुंबई (सांताक्रुझ) १७.८ (१), अलिबाग १८.४ (१), रत्नागिरी १९.७, भिरा १७.० (१), डहाणू १७.७ (१), पुणे ११.९, जळगाव ८.८ (-४), कोल्हापूर १७.५ (२), महाबळेश्वर १४.२, मालेगाव १२.२ (१), नाशिक १०.० (-१), निफाड ८.४, सांगली १६.१ (२), सातारा १५.४ (२), सोलापूर १५.७(-१), औरंगाबाद १३.० (१), बीड १२.२ (-२), परभणी (कृषी विद्यापीठ परिसर) ८.६, परभणी शहर १०.१ (-५), नांदेड १३.० (-१), उस्मानाबाद १०.९, अकोला १२.४ (-२),  अमरावती १५.२, बुलढाणा १४.२ (-२), चंद्रपूर ११.० (-२), गोंदिया ८.५ (-६), नागपूर ११.१ (-३), वाशीम  १२.०, ब्रह्मपुरी ९.९, वर्धा १३.० (-१), यवतमाळ १३.५ (-३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT