पाणीटंचाई
पाणीटंचाई 
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाई वाढली

टीम अॅग्रोवन

वाशीम : जिल्ह्यात पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने धरण प्रकल्प भरले नाहीत. त्याचा परिणाम थेट भूजल पातळीवर झाला अाहे. जानेवारीपासूनच पाणीटंचाई वाढलेली असून, अाता एप्रिलमध्ये त्याची तीव्रता वाढली अाहे.

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात प्रशासनाने ५१० गावांसाठी अाराखडा तयार केला असून, त्यात विहिरींचे अधिग्रहण, टँकरद्वारे पुरवठा, नळयोजना दुरुस्ती अशा सुमारे ५७८ उपाययोजना राबवण्याचे नियोजन करण्यात अाले अाहे. सद्यःस्थितीत ४४ पेक्षा अधिक गावांत विहीर अधिग्रहण व टॅंकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे.

वाशीम जिल्ह्यात या वर्षी पुरेसा पाऊस झाला नाही, परिणामी प्रकल्प कोरडे राहिले. त्यामुळे अाता पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची अोढाताण सुरू झाली अाहे. नागरिकांची पाण्यासाठी पायपीट होत अाहे. या वर्षातील पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५१० गावांकरिता पाणीटंचाई कृती आराखडा बनविण्यात अाला.

या अाराखड्यात गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण, टॅंकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, नळ योजनांची दुरुस्ती आदी ५७८ उपाययोजना केल्या जाणार आहेत. सद्यःस्थितीत ४४ गावांत विहीर अधिग्रहण, तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या अाराखड्यात पाणीटंचाई निवारणार्थ ४९९ गावांत विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित अाहे. ज्या गावांमध्ये विहीर अधिग्रहण शक्‍य नाही, अशा ७४ गावांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची उपाययोजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे. जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण्यासाठी विहीर अधिग्रहणावर सर्वाधिक भर दिल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाईच्या झळा ग्रामीण भागाला सहन कराव्या लागतात, त्यामुळे ग्रामीण भागातून पाणीटंचाई उपाययोजनांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जातात. मात्र, पंचायत समित्यांकडून हे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे तातडीने येत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातून पाण्यासाठी ओरड होऊनही त्यावर तातडीने उपाययोजना होत नसल्याचे प्रकार घडत अाहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT