पुणे विभागात सोमवारी (ता. २१) ५४ गावे १६६ वाड्यांना पाणीटंचाईची झळ बसत होती. शुक्रवारपर्यंत (ता. २५) टंचाईग्रस्त गावांची संख्या ७४ तर वाड्यावस्त्यांची संख्या २८० झाली आहे. टॅंकरची संख्या ४९ वरून ६५ झाली. चार दिवसांत २० गावे ११४ वाड्यावस्त्या टंचाईग्रस्त झाल्याने पाणीपुरवठ्यासाठी १६ टॅंकर सुरू करावे लागले अाहेत. यावरून वाढत्या पाणीटंचाईची स्थिती लक्षात येते.
विभागातील तालुकानिहाय टॅंकर स्थिती सातारा ः माण १०, जावळी १०, कोरेगाव ६, खटाव ५, महाबळेश्वर ३, पाटण २, वाई २, खंडाळा १. पुणे ः आंबेगाव ८, भोर ३, बारामती ३, खेड ३, जुन्नर ३, पुरंदर २. सांगली ः खानापूर ३.
जिल्हा | गावे | वाड्या | लोकसंख्या | पशुधन | टॅंकर |
पुणे | २१ | १५५ | ४६७४९ | ० | २३ |
सातारा | ४८ | १२२ | ५५९५६ | ९९५३ | ३९ |
सांगली | ५ | १ | ६७८२ | ० | ३ |
काेल्हापूर | ० | २ | ६७१ | २९० | ० |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.