जायकवाडी
जायकवाडी 
मुख्य बातम्या

नाशिकमधून जायकवाडीसाठी आज विसर्ग

टीम अॅग्रोवन

नाशिक :  नाशिकच्या धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा अखेर मुहूर्त ठरला आहे. आज (ता. ३०) पासून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. सोमवारी (ता. २९) दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज (ता. ३०) सकाळी दहा वाजता नाशिकच्या धरणातून सोडण्यात येणार असल्याचे या वेळी शिक्कामोर्तब झाले. यामुळे नाशिकच्या गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणांतून ३.२४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणात सोडले जाईल. नाशिक जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह पाटबंधारे अधिकारी उपस्थित होते. पाणी सोडण्याच्या वेळेस ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस दारणा धरणातून १५ हजार क्युसेक तर गंगापूर धरणातून ३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा गोदावरीत विसर्ग होणार आहे. गंगापूरसह पालखेड आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. गोदावरी मराठा विकास महामंडळाने जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.  यापैकी ३.२४ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तिन्ही धरणसमूहांमधून सोडावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असून, अन्य तालुक्यांमध्येही पुरेशा पाण्यासाठी रहिवाशांना आतापासूनच वणवण करावी लागते आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. पाणी सोडले जाऊ नये, यासाठी अल्प कालावधीत उभारण्यात आलेला न्यायालयीन लढाही अपयशाच्या वाटेवर असून, सोमवारपासून पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. पाणी सोडण्यात आणि ते जायकवाडीमध्ये पोचविण्यात ज्या यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, अशा यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली होती. बैठकीस शहर आणि ग्रामीण पोलिसांसह, पाटबंधारे, महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करावयाच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. गंगापूरसह दारणा आणि पालखेड या दोन्ही धरणसमूहांमधून मंगळवारी सकाळपासून पाणी सोडण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT