water discharge from ‘Radish’ fixed at twelve thousand cusecs
water discharge from ‘Radish’ fixed at twelve thousand cusecs 
मुख्य बातम्या

‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर स्थिर

टीम अॅग्रोवन

नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस काहीसा कमी झाल्याने मुळा धरणाचा विसर्ग दोन दिवसांपासून बारा हजार क्युसेकवर स्थिर ठेवला आहे. दरम्यान पावसाने शेतपिकांचे नुकसान होतच आहे. अनेक भागात सततच्या पावसामुळे जमिनीतून निचरा होत नसलेले पाणी साठवून राहत असल्याने पिके सडली आहे. रविवारी (ता. २०) सायंकाळी कर्जत तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला.

नगर जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहेत. सर्वांत मोठ्या असलेल्या मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरू असल्याने चार दिवसांपूर्वी मुळा धरणातून वीस हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता. मात्र, दोन दिवसांपासून पाणलोटात पाऊस काहीसा कमी झाल्याने रविवारपासून धरणातील व विसर्ग बारा हजार क्युसेकवर स्थिर ठेवला आहे. मात्र, सलग दहा-बारा दिवसांपासून पाऊस सुरुच असल्याने खरिपातील पिकांचे नुकसान होतच आहे.

सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कापसासह कांदा रोपांना मोठा फटका बसत आहे. अनेक भागात सततच्या पावसाने शेतीत पाणी साठवून राहत आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने जमिनी चिभडल्या जात असून पिकेही सडू लागली आहेत. प्रशासनाकडून पंचनामे केले जात असल्याचे सांगितले जात असले तरी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. मात्र, नेमके किती नुकसान झाले याची माहिती मात्र कृषी विभागाकडे नाही.

रविवारी कर्जत तालुक्यातील काही गावांत जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिके वाहून गेली आहेत. सततच्या पावसाने खरिपातील बहुतांश पिके संकटात आली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT